जळगाव तालुक्यातील नांद्रा येथील घटना
याप्रकरणी तुळसाबाई बळीराम बावीस्कर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सोमवारी ७ एप्रिल रोजी चंद्रभान किटकुल सोनवणे, रविंद्र चंद्रभान सोनवणे, कोकिळा सोनवणे, मंगला सोनवणे, शोभा सोनवणे, रत्ना सोनवणे यांनी तुळसाबाई यांना जुन्या वादातून शिवीगाळ करुन चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी तुळसाबाई यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन ६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस हेडकॉन्स्टेबल अभिषेक सुरेश पाटील यांच्या फिर्यादीवरुन तब्बल ११ जणांवर जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही गटातील संशयितांनी हाणामारी करत, शांततेचा भंग केल्याप्रकरणी पोलिसांकडून हा गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये तुळसाबाई बाविस्कर, वैशाली बाविस्कर, लता बाविस्कर, कविता बाविस्कर, संगीता बाविस्कर यांचा सहभाग आहे. या प्रकरणी पुढील तपास संजय भालेराव हे करत आहेत.