जळगाव ( प्रतिनिधी ) – जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीतील सर्वपक्षीय पॅनलमधून बाजूला होत ही निवडणूक स्वबळावर लढविण्याचा निर्णय आज जिल्हा काँग्रेसने जाहीर केला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष आणि शहराध्यक्षांच्या उपस्थितीत एका पत्रपरिषदेत या निर्णयाची घोषणा केली
https://www.facebook.com/kesarirajjalgaon/videos/1197567890648710
या निर्णयाची तपशीलवार माहिती देत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार पुढे म्हणाले की , जिल्ह्यातील सगळे तालुकाध्यक्ष आणि शहराध्यक्ष मी आज जळगावात बोलावले होते आम्ही सगळ्यांनी ३ तास चर्चा केली आम्ही सर्वांनी हा निर्णय एकमताने घेतला आहे . जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करायला कालपासून सुरुवात झाली आहे आधी सर्वपक्षीय पॅनल तयार करण्याच्या प्रक्रियेत मी थेट सहभागी नव्हतो माझी नेमणूक आताच झालेली आहे सगळे सहकारी आणि नेत्यांशी चर्चा करून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे सर्वपक्षीय पॅनलचे जागावाटप जाहीर झाले त्यावेळी शिवसेनेचे नेते आणि पालकमंत्री गुलाबराव पाटीलही असेच म्हणाले होते की हे जागावाटप अंतिम समजू नये यावर चारही पक्षांचे जिल्ह्यातील नेते त्यांच्या वरिष्ठांशी चर्चा करतील आणि त्यानंतर अंतिम निर्णय जाहीर केला जाईल . दरम्यान जिल्ह्यात तर काही बातम्या तर जागावाटप आणि उमेद्वारपण निश्चित झाल्याच्या आल्या आहेत ! आम्ही विचार केला की कदाचित जगातील सगळ्यात मोठे आंदोलन सध्या भारतात शेतकऱ्यांचे सुरु आहे आता पुढच्या महिन्यात या आंदोलनाला एक वर्ष पूर्ण होईल उत्तरप्रदेशातील लखीमपूरच्या घटनेचा निषेध म्हणून महाराष्ट्रात बंदपण पाळला गेला भाजपच्या राजवटीचा हाच दोष आहे असे कित्येक दोष भाजपचे सांगता येतील कधीनवत सत्ता मिळालेल्या भाजपकडून देशभरात द्वेषाचे राजकारण केले जात आहे लोकशाहीचे चारही आधारस्तंभ त्यांनी खिळखिळे केले आहेत काँग्रेसची ७० वर्षे सत्ता होती पण काँग्रेसने कधीच न्यायपालिकेत हस्तक्षेप केला नाही आणि त्यांनी निवृत्त झालेला न्यायाधीश लगेच राज्यसभेवर पाठवला , राज्यपाल त्यांच्या पक्षाचा कार्यकर्ता असल्यासारखे बोलतो आणि वागतो आहे , लोकशाहीतील ही पदे विशिष्ट जबाबदारी आणि मर्यादांची असतात भाजपने सगळी मूल्ये पायदळी तुडवली आहेत लष्करातही त्यांनी राजकारण सुरु केले आहे एक म्हण आहे की , मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार … पण येथे तर दोन बोक्यांच्या गळ्यात घंटा बांधायची आहे आम्ही ती बांधू अशा परिस्थितीत जिल्हा बँकेत भाजपसोबत बसणे आमच्या तत्वात बसत नाही आम्हाला केवळ सत्तेसाठी तत्वांशी तडजोड करायची नाहीय निवडणुकीतील यश आणि अपयश हा पुढचा भाग आहे सत्ता मिळाली नाहीतरी आम्ही संघर्ष करत राहुत पण भाजपच्या साथीने आम्हाला काहीच नकोय भाजपसोबत जिल्हा बँकेत आपण का बसावे ?, हाच आमच्यापुढे मुद्दा होता यापुढेही जिथे भाजप तिथे आम्ही जाणार नाही , असेही ते म्हणाले .
आपली भूमिका स्पष्ट करताना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार म्हणाले की , आम्ही आमचा या सर्वपक्षीय पॅनलमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे आमचे आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेलाही आवाहन आहे की त्यांनी भाजपला बाजूला टाकावे . राज्यात अधिकृत महाविकास आघाडी आहे आपण तसेच महाविकास आघाडी बनवून ही जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक लढवू शकतो . आमची त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला विनंती आहे . या दोन पक्षांची अशा महाविकास आघाडीची तयारी असेल तर आमचीही आहे अशी आघाडी नाही झाली तर आम्ही स्वतंत्र लढू पण आमच्या तत्वांशी तडजोड करणार नाही
यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी पक्षातील त्यांची कारकीर्द माहिती नाही असे सांगत ते विजनवासात होते असे म्हणणाऱ्या स्थानिक माध्यमांवरही ओरखडे ओढले.