हिवाळ्यातील आहार हा स्निग्धयुक्त असावा. दूध, तूप, लाेणी यांचा आहारात समावेश करावा. यामध्ये भरपूर प्रमाणात स्निग्धता, कॅलरीज असतात. त्यामुळे हिवाळ्यातील उष्णतेचे संतुलन राखण्यास मदत हाेते. या माेसमात शरीरात काेरडेपणा वाढताे ताे कमी करण्यासाठी आहारात दुग्ध आणि स्निग्धयुक्त पदार्थांचे प्रमाणे वाढवावे.साजूक तुपात बनवलेले सुक्यामेव्याचे, डिंक, तीळ, मेथीचे लाडू शरीराला बलवर्धक ठरतात. तसेच अक्राेड, खारीक, बेदाणे, खाेबरे, गूळ शेंगदाणे अशा प्रथिनांचे सेवन आपल्या प्रकृतीनुसार हिवाळ्यात वाढवावे. मांसाहारात अंडी-चिकन यांचा आवर्जून वापर करावा. या माेसमात पचनक्रिया उत्तम पद्धतीने काम करत असते. या ऋतुत हिरव्या पालेभाज्या, गाजर, आवळा इ.मुबलक आणि स्वस्त मिळतात त्याचा स्वास्थ्यासाठी फायदा करून घ्यावा.
सकाळी लवकर उठून व्यायाम करावा. व्यायामामुळे शरीर सुदृढ राहते. ऋतुमानानुसार तुमच्या आहारात बदल करणे गरजेचे आहे. हिवाळ्यात स्निग्ध पदार्थ, उष्ण पदार्थ खाण्याची शरीराला जास्त गरज असते. त्यानंतर पाेटभर नाश्ता करावा. नाश्त्याला तुम्ही दूध, उकडलेलं अंड, ब्रेड-बटर, उपमा, सँडविच, डाेसा यांचं सेवन करावं. शक्यताे अतितेलकट पदार्थ सकाळी खाणं टाळावं. नाश्त्यानंतर फळ खाल्ल्यानं फायदा हाेताे. थंडीच्या माेसमात फळांचं सेवन करण्यावर अधिक भर द्यावा. ज्यांना श्वसनाचे आजार आहेत अशांनी थंड गुणधर्म असणारी म्हणजे पेरू, केळी सारखी फळे डाॅक्टरांच्या सल्ल्याने खावीत. सकाळचा नाश्ता हा कायम भरपेट असायला हवा.ताे पाेटभर करणं आवश्यक आहे. रात्री लवकर जेवल्यानंतर साधारण ९ तास पाेटात काही नसल्यानं अॅसिड तयार हाेतं. त्यामुळे याेग्य वेळी पाेटभर न खाल्ल्यानं अॅसिडिटीचा त्रास हाेऊ शकताे.