शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातर्फे आयोजन
जळगाव (प्रतिनिधी) : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या जनऔषधवैद्यकशास्त्र विभागातर्फे ‘दैनंदिन आरोग्याची काळजी घेताना आहाराचे महत्व’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा बुधवारी दि. २६ रोजी सकाळी आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेचे उदघाटन अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, डॉ. किशोर इंगोले, जनऔषधवैद्यकशास्त्र विभागप्रमुख डॉ. योगिता बावसकर मंचावर उपस्थित होते. सुरुवातीला मान्यवरांनी दीपप्रज्वलन केले.
प्रस्तावनामध्ये कार्यशाळा घेण्यामागील उद्देश डॉ. योगिता बावस्कर यांनी सांगितला. सद्यस्थितीत संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढत आहे. त्यासाठी आहारातील चुकीच्या पद्धती कशा जबाबदार हे त्यांनी सांगितले. यानंतर अधिष्ठाता डॉ. गिरीष ठाकूर यांनी सांगितले की, जीवनशैली चांगली असेल व त्याला चांगल्या आहाराची जोड मिळाली तर निश्चितच आरोग्य चांगले राहते.
यानंतर आहारतज्ज्ञ डॉ. झिशान अली यांनी मार्गदर्शन केले. आहारातील विविध घटकांचे महत्व त्यांनी सांगितले. तसेच्या आजारापासून लांब राहण्यासाठी आहारात वेळोवेळी कोणते बदल करावे याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली. तर शेफ रिशू शर्मा यांनी दुग्धजन्य पदार्थ व मांस न वापरता चविष्ट व पौष्टिक पदार्थ कसे करावे याबाबत त्यांनी प्रात्यक्षिकच दाखविले. यावेळी विद्यार्थ्यांनी व प्राध्यापकांनी प्रश्नोत्तरांच्या स्वरूपात जाणून घेतले.
सूत्रसंचालन प्रद्युमन होगे याने केले. तर आभार डॉ. आश्लेष रूपांनी यांनी मानले. कार्यक्रमासाठी जनऔषधवैद्यकशास्त्र विभागातील सहायक प्रा. विलास मालकर, डॉ. जितेंद्र सुरवाडे, डॉ. डॅनियल साजी, डॉ. दीपक वाणी, डॉ. अन्वेष साहू, डॉ. अहमद अकबानी, डॉ. शाहिद हमीद, डॉ. अश्विनी जेवरीकर यांच्यासह राकेश पिंपरकर आदींनी परिश्रम घेतले.