जळगावातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन तर रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक अशा एकूण तीन अल्पवयीन मुलींना कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले. ही घटना शुक्रवार दि. ९ रोजी उघडकीस आल्यानंतर मुलींच्या कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञातांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी १५ वर्षीय तर दुसऱ्या घटनेत १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला त्यांच्या कुटुंबियांच्या रखवालीतून कोणीतरी अज्ञात व्यक्तीनी फुस लावूनपळवून नेले.
तर तिसऱ्या घटनेत रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला तीची आई घरकाम करण्यासाठी बाहेर गेलेली असतांना, तिच्या घरासमोर राहणाऱ्या तरुणाने तीला फूस लावून पळवून नेले. या तिघ मुलींचा शोध घेतला, मात्र तरी देखील त्या मिळून न आल्याने अखेर त्यांच्या कुटुंबियांनी संबंधित पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार एमआयडीसी व रामानंद नगर पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एमआयडीसी पोलीस व रामानंद नगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी करीत आहे.