जळगाव ( प्रतिनिधी ) – जीवन संजिवनीमुळे नागरिक जीवनरक्षक बनू शकतात , असे प्रतिपादन आज प्रख्यात आय सी यू तज्ञ डॉ लीना पाटील यांनी केले जागतिक भूलशास्त्र दिनानिमित्त आयोजित एका प्रशिक्षण कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
१६ ऑक्टोबर हा दिवस जागतिक भूलशास्त्र दिन म्हणून साजरा केला जातो त्यानिमित्त भारतीय भूलतज्ज्ञ संघटनेच्यावतिने जीवन संजिवनी क्रिया प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
भूलतज्ञ डॉ लीना पाटील यांनी यावेळी हृदय विकाराचा तीव्र झटका आल्याने व्यक्ती तुमच्यासमोर खाली पडला किंवा विजेचा झटका लागून खाली पडला अथवा पाण्यात बुडालेला व्यक्ती बाहेर काढल्यावर काय करायला पाहिजे याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. त्याच्यामध्ये जीवनचिन्ह असेल तर , ती व्यक्ती श्वास घेत असेल तर त्वरित डॉक्टरकडे घेऊन जा परंतु ती व्यक्ती श्वास घेत नसेल, तिला जीवनचिन्ह नसेल तर त्या व्यक्तीला विशिष्ट पद्धतीने हृदय कम्प्रेशन कसे द्यावे याचे प्रशिक्षण देण्यात आले.
खाली पडलेल्या व्यक्तीमध्ये जीवन चिन्ह नसेल तर छातीमध्ये ३ मिनिटाच्या आत त्याला ही जीवन संजीवनी क्रिया मिळाली तर त्या व्यक्तीचां रक्तपुरवठा ऑक्सिजन मेंदूपर्यंत हृदय जीवन संजीवनी क्रियेमुळे पोहचू शकते , असे या प्रशिक्षणात सांगण्यात आले विशेष म्हणजे या कार्यक्रमात स्वतः जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी स्वतः जीवन संजीवनी क्रियेचे प्रशिक्षण घेतले. जळगाव भूलतज्ञ संघटनेचे सचिव डॉ ललित पाटील यांनी आधी सादरीकरणातून बारकावे समजावून सांगितले.. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनीही यावेळी मार्गदर्शन केले
डॉ प्रकाश सुरवाडे , डॉ हरणखेडकर , डॉ लीना पाटील ( आय सी यू तज्ञ )., डॉ अमित हिवरकर , डॉ . धीरज चौधरी , डॉ प्राजक्ता जावळे हे भुलतज्ञ उपस्थित होते उप जिल्हाधिकारी प्रवीण महाजन आणि त्यांचे सहकारी , इंडियन मेडिकल असोसिएशनचे सचिव डॉ राधेश्याम चौधरी उपस्थित होते.