ना कजरे की धार ना मोतीयो के हार गिताव्दारे माजी खा.डॉ.उल्हास व डॉ वर्षा पाटील यांच्यातील गायकाचे घडले दर्शन![]()
जळगाव (प्रतिनिधी):- येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या आग्नेय बॅचतर्फे आयोजित समन्वय २०२६ सप्ताहांतर्गत टीचर्स ज्युनिअर नाईटमध्ये डॉक्टर व विद्यार्थ्यांनी विविध कलाविष्कार साकारले. डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या एमीबीएस अभ्यासक्रमाच्या आग्नेय बॅचतर्फे १२ ते १८ एप्रिल या कालावधीत समन्वय २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे उदघाटन माजी खा.डॉ.उल्हास पाटील यांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी सचिव डॉ.वर्षा पाटील, सदस्य डॉ. वैभव पाटील, वैद्यकिय संचालक डॉ. एन एस आर्विकर,अधिष्ठाता डॉ.प्रशांत सोळंके, वैद्यकिय अधिक्षक डॉ.प्रेमचंद पंडीत, डॉ. सी कांते, डॉ. गुणंवतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. हर्षल बोरोले, डॉ. उल्हास पाटील होमीओपॅथीक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंकज शर्मा, प्रशासन अधिकारी प्रमोद भिरूड यांच्यासह मान्यवर उपस्थीत होते. विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी एकत्र येत अविस्मरणीय सांस्कृतिक सायंकाळ अनुभवली. या कार्यक्रमात जुन्या हिंदी गाण्यांच्या माध्यमातून शिक्षकांना अनोख्या पद्धतीने सादरीकरण केले.कार्यक्रमाची सुरुवात उत्साहपूर्ण वातावरणात प्रमोद भिरूड यांनी सोळा बरस की बाली उमर को सलाम या गाण्यातुन सुरू झालेली प्रेमाची साद डॉ उमाकांत अणेकर यांनी किसी राह पर किसी मोड़ पर आणि डॉ. अनंत बेडांळे गुलाबी आंखें, डॉ.सी कांते यांनी जाने वाला जरा मुड़के देखो, आये सनम जिसने तुझे चाँदसी सूरत दी है, प्रेमाला साद घातली. वैद्यकिय संचालक डॉ. एन एस आर्विकर यांनी इतना ना मुझसे तू प्यार बढ़ा,तर अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके यांनी सोचेंगे तुम्हे प्यारने उत्तर दिले यावर डॉ. माया आर्विकरांनी मेरा दिल ये पुकारे आजा,आणि डॉ. वैभव पाटील यांनी ये शाम मस्तानी गाणे म्हणत तरूणाईत उत्साह भरला.भुलरोग तज्ञ डॉ. मोहीत यांनी बेकरार करके यु ना जाया करो नंतर माजी खा. डॉ. उल्हास पाटील आणि वर्षा पाटील यांनी कजरे की धार से ना मोतीयो के हार से गाणे सादर करीत जून्या आठवणींना उजाळा दिला. तर विद्यार्थ्यांनी आपल्या आवडत्या शिक्षकांना गाण्यांच्या ओळींमधून साद घालत एक वेगळाच रंग भरला. गाण्यांद्वारे रंगत वाढली तसेच अशा गाण्यांमधून शिक्षक-विद्यार्थी उपस्थितांमध्ये उत्साह आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी समन्वयक भावेश जाधव, अजहर खान, मोमीन आयशा, अश्विनी जाधव, वैष्णवी वानखेडे, अंकित मुंढे, अवधूत जंगलवाड, अपूर्वा लोहगावकर यांनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार अपुर्वा पाटील, गर्व मनदोत,सचिता श्रीवास्तव आणि श्रेयन व्यवहारे यांनी मानले. अशा सांस्कृतिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, सर्जनशीलता आणि शिक्षकांप्रती आदरभाव वाढीस लागतो, असे शैक्षणिक संस्थांमधील कार्यक्रमांमधून दिसून येते.
कार्यक्रमाचे उदघाटन माजी खा.डॉ.उल्हास पाटील यांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी सचिव डॉ.वर्षा पाटील, सदस्य डॉ. वैभव पाटील, वैद्यकिय संचालक डॉ. एन एस आर्विकर,अधिष्ठाता डॉ.प्रशांत सोळंके, वैद्यकिय अधिक्षक डॉ.प्रेमचंद पंडीत, डॉ. सी कांते, डॉ. गुणंवतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. हर्षल बोरोले, डॉ. उल्हास पाटील होमीओपॅथीक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंकज शर्मा, प्रशासन अधिकारी प्रमोद भिरूड यांच्यासह मान्यवर उपस्थीत होते. विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी एकत्र येत अविस्मरणीय सांस्कृतिक सायंकाळ अनुभवली. या कार्यक्रमात जुन्या हिंदी गाण्यांच्या माध्यमातून शिक्षकांना अनोख्या पद्धतीने सादरीकरण केले.कार्यक्रमाची सुरुवात उत्साहपूर्ण वातावरणात प्रमोद भिरूड यांनी सोळा बरस की बाली उमर को सलाम या गाण्यातुन सुरू झालेली प्रेमाची साद डॉ उमाकांत अणेकर यांनी किसी राह पर किसी मोड़ पर आणि डॉ. अनंत बेडांळे गुलाबी आंखें, डॉ.सी कांते यांनी जाने वाला जरा मुड़के देखो, आये सनम जिसने तुझे चाँदसी सूरत दी है, प्रेमाला साद घातली. वैद्यकिय संचालक डॉ. एन एस आर्विकर यांनी इतना ना मुझसे तू प्यार बढ़ा,तर अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके यांनी सोचेंगे तुम्हे प्यारने उत्तर दिले यावर डॉ. माया आर्विकरांनी मेरा दिल ये पुकारे आजा,आणि डॉ. वैभव पाटील यांनी ये शाम मस्तानी गाणे म्हणत तरूणाईत उत्साह भरला.भुलरोग तज्ञ डॉ. मोहीत यांनी बेकरार करके यु ना जाया करो नंतर माजी खा. डॉ. उल्हास पाटील आणि वर्षा पाटील यांनी कजरे की धार से ना मोतीयो के हार से गाणे सादर करीत जून्या आठवणींना उजाळा दिला. तर विद्यार्थ्यांनी आपल्या आवडत्या शिक्षकांना गाण्यांच्या ओळींमधून साद घालत एक वेगळाच रंग भरला. गाण्यांद्वारे रंगत वाढली तसेच अशा गाण्यांमधून शिक्षक-विद्यार्थी उपस्थितांमध्ये उत्साह आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी समन्वयक भावेश जाधव, अजहर खान, मोमीन आयशा, अश्विनी जाधव, वैष्णवी वानखेडे, अंकित मुंढे, अवधूत जंगलवाड, अपूर्वा लोहगावकर यांनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार अपुर्वा पाटील, गर्व मनदोत,सचिता श्रीवास्तव आणि श्रेयन व्यवहारे यांनी मानले. अशा सांस्कृतिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, सर्जनशीलता आणि शिक्षकांप्रती आदरभाव वाढीस लागतो, असे शैक्षणिक संस्थांमधील कार्यक्रमांमधून दिसून येते.











