शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा प्रवेश
धरणगाव (प्रतिनिधी) :- येथील शहरातील आणि तालुक्यातील शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह अल्पसंख्यांक बांधवांनी भारत राष्ट्र समिती म्हणजेच बीआरएस पक्षात जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पाटील ऊर्फ लकी अण्णा यांचे प्रमुख उपस्थितीत प्रवेश केला. यावेळी बीआरएस पक्षाचे गुलाबी रुमाल आणि माहिती पुस्तिका देवून जिल्हाध्यक्ष लकी अण्णा यांनी स्वागत केले. जळगाव ग्रामीण मध्ये बीआरएस पक्ष प्रवेशाचे सत्र सुरूच असून, मोठ्या संख्येने कार्यकर्ते प्रवेश करत आहेत.
यावेळी वाहतूक सेल जिल्हाध्यक्ष भगवान धनगर, जिल्हा प्रवक्ते ओंकार माळी, तालुकाध्यक्ष जगन्नाथ महाजन, कार्याध्यक्ष कालू मोमीन, कार्याध्यक्ष भावसिंग सोनवणे,अल्पसंख्यांक सेल तालुका अध्यक्ष दगा रहमान,अल्पसंख्यांक सेल शहर अध्यक्ष फैजान मोमीन, मागासवर्गीय सेल तालुका अध्यक्ष आनंदा गोधडे, उपाध्यक्ष सागर गायकवाड, युवा शहर अध्यक्ष आकाश बडगुजर, स्वामी पाटील,नरेंद्र पाटील,विजय पाटील तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
अल्पसंख्यांक बांधवांमध्ये शेख उमर अहमद, अझरुद्दीन शेख, रिजवान खान रसूल खान,अनिस खान अकबर खान, शेख आरिफ सलीम, अवैस खान, अनिस खान, एजाज खान, शेख तनवीर अलीम शेख, शेख वाहेत, खान अख्तर, शेख आरिफ ताज हरामत, मुतालीफ सय्यद जमील,जहीर खान,रोशन शेख,फर्मं दानिश अबसलीम,सय्यद इमाम सय्यद लाला,मोसिन खान, यासीन शेख जुबेर शेख,जाकीर जुनेद खान, फिरोज खान चांद खान,आयुब उमीद खान, अल्ताफ खान अय्याज खान,युसुफ रहमान खान पठाण, रहमान खान अकबर खान, शरीफ शेख बिलालुद्दीन, अकबर खान मजीद खान,शेख अब्दुल्लाह शेख मन्सूर, सय्यद जुल्फेकार सय्यद मुक्तार,जलीलुद्दीन शमशुद्दीन शेख,अमीर शेख,इमरान खान,शाहरुख शेख गुफार मेहमूद खान मुसलिम खान, अनिस खान,असलम खान
तसेच किरण पाटील,साहेबराव पाटील, शंकर पाटील, दगडू चांभार, प्रकाश चौधरी,सत्यवान पाटील,दादू पाटील,धनराज पाटील,संभाजी पाटील,राजू पाटील यानी बीआरएस पक्षात जिल्हाध्यक्ष लकी अण्णांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला आहे.
“बीआरएस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव म्हणजेच केसीआर साहेबांचे शेतकरी आणि गोर गरीब जनतेच्या हितासाठी असणारी दूरदृष्टी असे नेतृत्व यावर विश्वास ठेवत तसेच प्रभारी के वामशीधरराव , किसान सेल माणिकराव कदम, उ.म.समन्वयक नानासाहेब बच्छाव यांचे मार्गदर्शनात आता लोकांना परिवर्तन हवे आहे.शेतकरी आणि गोर गरीब जनतेच्या प्रलंबित समस्या सोडविण्यास सरकारची असणारी उदासीनता यामुळे तळागाळातील कार्यकर्ते बीआरएस पक्षात प्रवेश करत असून, आगामी निवडणुकीत आता बीआरएस पक्षाचा गुलाबी झेंडा नक्कीच फडकेल असा ठाम विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया जिल्हाध्यक्ष लक्ष्मण गंगाराम पाटील ऊर्फ लकी अण्णा यांनी दिली आहे.