चाळीसगाव ;– सध्या कोरोना आजाराच्या पार्शवभूमीवर संचारबंदी लागू असली तरी काही किराणा दुकानदारांकडून ग्राहकांची सर्रास लूट असल्याची तक्रार तहसीलदार त्यांच्याकडे करण्यात आली असून कारवाई करावी अशी मागणी होत आहे .
तक्रारीत म्हटले आहे कि , चाळीसगांवातील किराणा दुकानदार उचलत असून माल शिल्लक नाही,तिकडे भाव वाढले असे निमित्त दाखवुन प्रत्येक ग्राहकास संचारबंदीचे भुत दाखवूत लुटमार करीत आहे.८८ रू किलोचे तेल १३२०/१३०, ९०रू.किलोचे शेंगदाने ११०/१२५ अश्या प्रकारे सर्वच मालसामानात लुटमार सुरू असून तहसिलदार चाळीसगांव व अन्न व औषध प्रशासन अधिकारींनी तातडीने चाळीसगांव येथे भेट देऊन किराणा दुकानंदारांवर कारवाई करावी सोबतच प्रत्येक दुकानावर भावफलक, मालाचा स्टाँक, याबाबत दररोज नोंदी ठेवण्याचे निर्देश द्यावेत. अन्यथा कोरोना निमित्तच्या संचारबंदीचा आदर करणार्या नागरीकांना लुटमारीचा तडखा सुरूच राहील व यात पिळलेला नागरीक संतप्तपणे आपला राग व्यक्त करण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी महोदय तहसिलदार चाळीसगाव व पुरवठा निरीक्षक यांनी तातडीने चाळीसगांव येथे भेट देऊन दुकानदारांना सूचना करून कारवाई करावी अशी मागणी होत आहे.