जळगाव (प्रतिनिधी ) – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त यावर्षी सरकारच्या वतीने ‘हर घर तिरंगा’ मोहीम राबवण्यात येत आहे. ही अभिमानाची गोष्ट आहे. तरी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाची विटंबना रोखण्यासाठी प्रशासनाने योग्य ती पाऊले उचलावीत, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जळगाव जिल्ह्यातील प्रशासन, पोलीस आणि शाळा-महाविद्यालय यांना निवेदन सादर करण्यात आले. तसेच काही शाळांतील विद्यार्थ्यांचे प्रबोधनही करण्यात आले.
समितीच्या वतीने जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथील पोलीस निरीक्षक अवतारसिंह चौहान, गटशिक्षणाधिकारी भावना भोसले, नायब तहसीलदार सचिन बाभळे, चाळीसगाव येथील तहसीलदार अमोल मोरे, भुसावळ येथील प्रांताधिकारी रामसिंग सुलाने या प्रशासकीय अधिकाऱ्यांसह जळगाव जिल्ह्यातील यावल, चोपडा, भुसावळ, पाचोरा, चाळीसगाव, जळगाव ग्रामीण, रावेर, एरंडोल, धरणगाव येथील ६० हून अधिक शाळा आणि २ महाविद्यालये यांना निवेदन देण्यात आले.
या वेळी जळगाव येथे आकाश चव्हाण, विनोद सपकाळे, भूषण पाटील, इमरतसिंग पावर, भिकन मराठे, मंदार जोशी, रामकृष्ण चौधरी, दिगंबर माळी, राजेंद्र वराडे, सुभाष देवकर, भूषण पाटील, अमोल पाटील, चेतन पाटील, प्रमोद पाटील सौ. अरुणा महाजन, सौ. निर्मलाबाई पाटील, सौ. जानकी वाघ, सौ. वर्षा पाटील हे धर्मप्रेमी उपस्थित होते.