नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
जळगाव (प्रतिनिधी) : चोपडा तालुक्यात असणाऱ्या अनेर मध्यम प्रकल्प क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरण क्षेत्रामध्ये पाण्याची आवक वाढली आहे. सध्यस्थितीत अनेर प्रकल्पातून १८ हजार ५०० ने विसर्ग नदी पात्रात चालू आहे. पाण्याची आवक बघता विसर्ग वाढण्याची शक्यता आहे.
त्यामुळे अनेर नदीच्या दोन्ही तीरावरील नागरिकांना कळवण्यात येते की, नदी काठच्या नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन कार्यकारी अभियंता, धुळे पाटबंधारे विभाग व उपविभागीय अधिकारी पाटबंधारे उपविभाग, शिरपूर तसेच शाखा अधिकारी अनेर शाखा यांच्या वतीने करण्यात येत आहे.