जळगाव शहरातील रामनगर येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : भाडे तत्वावर घरात राहत असताना उसनवारीने दिलेले पैसे परत मागितल्याने घरमालक माया वालचंद तांबे (३०, रा. रामनगर) या महिलेला एका जणाने मारहाण केली. ही घटना शनिवार, १८ मे रोजी रामनगरात घडली. या प्रकरणी सोमवार, २० मे रोजी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
तांबापुरा परिसरातील एक जण माया तांबे यांच्या घरात भाडेतत्वावर राहत होता. त्या वेळी या महिलेकडून त्याने उसनवारीने पैसे घेतले होते. हे पैसे १८ मे रोजी सदर महिलेने परत मागितले असता तिला शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली.
या प्रकरणी महिलेने एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून मारहाण करणाऱ्याविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस नाईक पंकज पाटील करीत आहेत.