माजी नगराध्यक्ष राजेंद्र पाटील यांचे प्रतिपादन
भडगाव ( प्रतिनिधी ) – भडगाव शहराच्या गेल्या पाच वर्षात चेहरा मोहरा बदलविण्याचे काम आ. किशोर पाटील यांनी केले आहे. त्यामुळे आमदार किशोर पाटील म्हणजे विकास असे जणू काही समीकरण बनल्याचे मत माजी नगराध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी व्यक्त केले आहे.
भडगाव शहरातील पुढील पंचवीस वर्षाची पाणीटंचाई लक्षात घेऊन आ. किशोर पाटील यानी तब्बल १३३ कोटी खर्चाची पाणीपुरवठा योजना मंजुर केली आहे. त्यात गिरणा नदिवर पक्का बंधार्यासह जलशुद्धीकरण प्रकल्पाचाही समावेश आहे. त्यामुळे शहराची पाणीटंचाई निकाली निघणार आहे.
शिवाय शहरातील सांडपाण्याचे व्यवस्थापनासाठी म्हणजेज भूमिगत गटारीसाठी तब्बल ८२ कोटीची योजना मंजूर करून आणत आरोग्याचा प्रश्नही निकाली निघाला आहे. तर त्यामुळे शहरातील रस्ते खोदले जाणार आहेत. त्यासाठी रस्त्याचा तब्बल १७० कोटीचा डीपीआर शासनाकडे मंजुरीसाठी प्रस्तावित करण्यात आला आहे. शिवाय भडगाव शहरात तळणीपरीसराचा व गिरणा काठावरील श्री स्वामी समर्थ मंदिराच्या विकासाठी पर्यटन विकास योजनेतुन ७ कोटीचा निधी मंजुर करून शहराच्या वैभवात मोठी पडणार आहे. ही दोन्ही कामे सुरू आहेत, अशी माहिती राजेंद्र पाटील यांनी दिली.
आमदार किशोर पाटील यांनी गेल्या निवडणुकीत भडगाव शहरवासीयांना गिरणा नदीवर आझाद चौक ते पेठ या ठिकाणी गिरणा नदिवर पुल बांधुन जुन्या भडगाव शहरातील शेतकर्याना शेतात जाण्याची मोठी सोय होणार आहे. तर जुन्या गावातील व्यापार ही वृध्दिंगत होण्यास मोठी मदत होणार आहे. याशिवाय जुन्या वाक रस्त्यावर ही गिरणा नदिवर पुल बांधून तब्बल ३ किलोमीटरचा फेरा वाचविला आहे. आ. किशोर पाटील यांच्याकडे विकासाचे व्हीजन असल्याचे मत माजी नगराध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी व्यक्त केले.