जळगाव तालुक्यातील आसोदा येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : आई वडील शेतात गेलेले असतांना घरी एकटाच असलेल्या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवार दि. २० जानेवारी रोजी सकाळी १२ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. तरुणाच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
खिलचंद पंडीत कोळी (वय २२, रा. इंदिरानगर, असोदा, ता. जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो आई-वडील यांचेसह राहत होता. शेती करुन आपल्या कुटुंबाला हातभार लावित होता.(केसीएन)सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे त्याचे आईवडील हे शेतात गेलेले होते. खिलचंद हा घरी एकटाच होता. त्याने घरात छताला गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. गल्लीत राहणाऱ्या तरुणाच्या ही घटना लक्षात येताच त्याने घटनेची माहिती खिलचंद यांच्या आई वडीलांना दिली.
त्यांनी घराकडे धाव घेतली, दरम्यान, मुलाचा मृतदेह बघताच त्यांनी मन हेलावणारा आक्रोश केला. ग्रामस्थांनी खिलचंद याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करीत मयत घोषीत केले. तरुणाच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक तपास पोलीस नाईक नरेंद्र पाटील हे करीत आहे.