रावेर तालुक्यातील विवरे गावाजवळ घटना
रावेर प्रतिनिधी :- बु-हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावरील रावेर-सावदा या रस्त्यावर विवरे गावाजवळ एका मालवाहू वाहनाचा तोल गेल्याने १६ जण जखमी झाल्याची घटना गुरुवारी रात्री १२ ते १ वाजेच्या सुमारास घडली. घटनेप्रकरणी पोलीस स्टेशनला नोंद घेण्याचे काम सुरू होते.
किनगाव ता. यावलकडून बऱ्हाणपूरकडे कांद्याने भरलेले हे वाहन जात असताना विवरे गावाजवळ उलटले. जखमींपैकी शेख अमजद शेख सलीम, शेख कलीम शेख जैनौद्दीन हे गंभीर जखमी झाले आहे. इतर जखमींमध्ये शेख इमरान, आसीफ खान, शेख परवेज, शेख इस्माईल, शेख अजहर, शेख अनिस, शेख ऐजाज सर्व रा. कर्जीद ता. रावेर यांचा समावेश आहे.