जळगाव;- शहरात कोरोना रुग्नाची संख्या आणि संसर्ग पाहता सोमवार २० पासून प्रभागनिहाय जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला असून तो नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने पाळावा असे आवाहन आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी केले आहे
निवडणूक प्रभागामधील सर्व नागरिक, व्यावसायिक तसेच सर्व खाजगी आस्थापना यांनी त्या त्या दिवशी स्वयंस्फुर्तीने बंद पाळावा असे आवाहन करण्यात आले आहे. जनता कर्फ़्युसाठी शहराचे सहा विभागांत विभागणी करण्यात आली आहे.
प्रभागनिहाय जनता कर्फ्यू पुढील प्रमाणे …….
निवडणूक प्रभाग क्र. १, २, ३ साठी सोमवार २० जुलै रोजी जनता कर्फ्यू असणार आहे.
प्रभाग क्र. ४, ५, ६ मध्ये मंगळवार २१ जुलै रोजी जनता कर्फ्यू असणार आहे.
बुधवार २२ जुलै रोजी प्र.क्रं. ७, ८, ९ तर गुरुवार २३ जुलै रोजी प्र.क्रं. १०,११,१२ मध्ये जनता कर्फ्यू असणार आहे.
शुक्रवार २४ जुलै रोजी प्र.क्र.१३, १४, १५ मध्ये जनता कर्फ्यू असणार आहे
शनिवार २५ जुलै १६ व १७ तर रविवार २६ जुलै रोजी १८ व १९ प्रभागांमध्ये जनता कर्फ्यू पाळण्यात येणार आहे.
या जनता कर्फ्यू मधुन सर्व प्रकारच्या अत्यावश्यक सेवा, दवाखाने, क्लिनीक, सर्व औषधी दुकाने, सर्व तपासणी लॅब्स, शासकिय कार्यालये तसेच बँका यांना वगळण्यात आले आहे. तरी सर्व नागरिकांनी सोमवार दि. २० जुलै पासुन त्यांच्या प्रभागासाठी दिलेल्या कालावधीत स्वयंस्फुतीने बंद पाळून कोरोना विषाणूचा संसंग टाळण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी केले आहे.