जळगाव ;- तालुक्यातील कंडारी येथे तुषार सुर्वे नामक इसमाचा दगडाने ठेचून खून झाल्याची घटना काल येथे घडली होती . या प्रकरणी एलसीबीच्या पथकाने तातडीने सूत्रे हलवून तीन जणांच्या मुसक्या आवळल्या असून त्या तिघा आरोपींची खुनाची कबुली दिली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , विशाल देविदास मराठे (वय २२), राहुल नरेंद्र जाधव (वय १९) व गाेपाळ दिलीप भुसारी (वय २२, तिघे रा. कंडारी) असे अटक केलेल्या संशयितांंची नावे आहेत. बुधवारी रात्री रायपूर येथील उपसरपंच वसंत सीताराम धनगर व तुषार दोघांनी खळ्यात मद्यप्राशन केले. त्यानंतर धनगर हे तेथून निघून गेले होते. त्यानंतर रात्री ९ वाजता विशाल, राहुल व गोपाळ हे तिघे तुषार प्रभाकर सुर्वे (वय ४१) यांच्या खळ्यात पोहोचले. सुर्वे व राहुल यांच्यात नेहमीच वाद होत असे. याच जुन्या वादातून रात्री पुन्हा एकदा भांडण झाले. या वेळी राहुलने सुर्वे यांच्या डोक्यात दगड घालून त्यांना ठार केले. तर गोपळ व विशाल यांनीदेखील सुर्वेंना मारहाण केली होती. सुर्वेंचा खून केल्यानंतर तिघेजण गावात आले होते. गुरुवारी सकाळी ६ वाजता प्रल्हादराव शिवाजी देशमुख यांना सुर्वे यांचा मृतदेह खळ्यातीलपलंगावर आढळून आला. त्यांनी तुषार सुर्वेंच्या पत्नी मनीषा यांना ही माहिती दिली. तसेच अपर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके, भुसावळ उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राठोड, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बापू रोहोम, नशिराबाद पोलिस ठाण्याचे सहा. निरीक्षक प्रवीण साळुंखे, सचिन कापडणीस, विजयसिंग पाटील, नरेंद्र वारुळे, दर्शन ढाकणे, प्रवीण ढाके, सतीश पाटील, राजू सोळंखे व किरण बाविस्कर यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी केलेल्या चौकशीत तुषार खळ्यात रखवालीसाठी गेला होता. वाघूर धरणाजवळ घर असलेले वसंत धनगर यांनी मी रात्री ८.३० वाजेपर्यंतच तुषार सोबत होतो, असे तपासात सांगितले आहे. याप्रकरणी मृत सुर्वे यांच्या पत्नीच्या फिर्यादीवरून नशिराबाद पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
एलसीबीच्या पथकाने गुरुवारी दुपारी १२ वाजता राहुल, विशाल व गोपाळ या तिघांना ताब्यात घेतले होते. त्यांना पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. जुन्या वादातूनच हा खून केल्याचे संशयितांनी कबूल केले आहे. सुर्वे व राहुल यांच्यात नेहमीच वाद होत असे. याच जुन्या वादातून रात्री पुन्हा एकदा भांडण झाले. या वेळी राहुलने सुर्वे यांच्या डोक्यात दगड घालून त्यांना ठार केले. तर गोपळ व विशाल यांनीदेखील सुर्वेंना मारहाण केली होती. सुर्वेंचा खून केल्यानंतर तिघेजण गावात आले होते. गुरुवारी सकाळी ६ वाजता प्रल्हादराव शिवाजी देशमुख यांना सुर्वे यांचा मृतदेह