सामायिक करण्याचे महत्त्व आपल्याला ठाऊक आहे, तरी देखील सामायिक करणे म्हणजे आपल्यात समभाव प्राप्त करणे होय. सामायिक हे आत्मशुद्धी व मोक्षप्राप्तीचे व्रत असते. ते करत असतान काळजी घ्यावी. ४८ मिनिटे सर्व जगाला विसरून तुम्ही व्रतात रहावे, स्थिर रहावे यासाठी केलेली ती महत्त्वपूर्ण साधना आहे अशी माहिती परमपुज्य सुमित मुनीजी महाराज साहेब यांनी आजच्या प्रवचनात केले.
आपण सामायिक करताना आत्म्यास मलीन करणारे १८ पापांपासून आपण दूर राहतो का? आणि दुसरा उद्देश म्हणजे समभाव प्राप्ती होते का? हे दोन्ही उद्देश साध्य होत असतील तर आपण केलेली सामायिक फलदायी आहे असे समजावे. भय व लालच या दोन्ही गोष्टीमुळे केलेली सामायिक लागू पडत नाही हे उदाहरण स्पष्ट करताना एक गोष्ट त्यांनी सांगितली. भिल्ल वस्तीच्या एका खेड्यात गरीब तरुण पोहोचतो. तो खूप मेहनत घेत असतो काही वर्षात मोठा धनीक शेठ बनतो. आपले शोषण केल्यामुळे हा मोठा झाला याच्या संपत्तीची लूट करण्याचे काहींनी ठरविले. दररोज सामायिक करण्याचा नियम त्यांचा असतो. रात्री ते चोरी करण्यासाठी ते पोहोचतात. शेठ जागे आहेत म्हणून ते लपून बसतात. त्यांना पण सामायिक केल्याप्रमाणे स्थिर बसून रहावे लागते. नमोकार मंत्र म्हणत असताना त्या सर्वांना आपण पूर्वजन्मी जैन होतो व अव्रती राहिल्याने या वर्तमान काळात भिल्ल म्हणून जन्मास आले हे ज्ञात होते. त्यांना केवलज्ञान प्राप्त होते व त्यांचा उद्धार होतो. ही केलेली सामायिक खऱ्या अर्थाने फलदायी ठरते.
वितराग धर्मामुळे मोक्षपदी पोहोचता येते. आपल्या मनात धर्मा प्रती अविश्वास आणि संदेह बाळगू नये. आपण केलेली कोणतीच क्रिया निष्फळ नसते. भगवंताच्या वाणीवर विश्वास ठेवावा. ‘लाखों को पार लगाया है भगवान तुम्हारी वाणी ने।’ याबाबत परमपुज्य भूतीप्रज्ञ म.सा. यांनी प्रवचनातून सांगितले.