भुसावळ(प्रतिनिधी) : हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने धरणात पाणी वाढले आहे. हतनूर धरणाचे १८ दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले आहे. यामुळे धरणातून ८४ हजार ७७३ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे. यामुळे तापी नदीला पूर आला आहे. याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
मध्य प्रदेशात आणि विदर्भातील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे त्यामुळे तापी- पूर्णा नदीला पूर आला असून, हतनूर धरण क्षेत्रात पाण्याचा स्रोत वाढला आहे . हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने सोमवारी धरणाचे १८ दरवाजे पूर्ण उघडण्यात आले आहे.
हतनूर प्रकल्पची सद्यस्थिती
दिनांक – २५ ऑगस्ट २०२४
पाणी पातळी – 210.620 मी.
एकुण पाणी साठा= 218.80 दलघमी.
एकुण पाणी साठा टक्केवारी = 56.39%
विसर्ग- 2392 क्युमेक्स (84473 क्युसेक्स)
दरवाज्यांची सद्य स्थिती – १८ दरवाजे पूर्ण उघडे