जळगाव (प्रतिनिधी) : स्वातंत्र्यदिनी दिल्ली येथे होणाऱ्या लाल किल्ल्यावरील ध्वजारोहण समारंभासाठी खान्देशातील दोन महिला सरपंचांना निमंत्रित करण्यात आले आहे. यात, सायरा चिमण तडवी (देऊळगाव गुजरी, ता. जामनेर) आणि सुमन राहुल गावित (बोकळझर, ता. नवापूर) या दोन महिला सरपंचांचां समावेश आहे.
दिल्ली येथील मुख्य ध्वजारोहणास उपस्थित राहण्याचा मान पहिल्यांदाच जामनेर तालुक्यातील सरपंचाला मिळत आहे. याबाबत पंचायत राज संचालक सचिन घाडगे यांचे पत्र नुकतेच तडवी यांना मिळाले आहे. सायरा तडवी या परिवारासोबत दिनांक१३ रोजी दिल्ली येथे पोहोचणार आहेत. १४ रोजी पंचायत राज मंत्रालयाकडून महिलांबाबत कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. तडवी यांनी यापूर्वी जामनेर पंचायत समितीचे सभापतिपद भूषवले आहे.