खान्देश एक्सप्रेसमधील घटना
जळगाव (प्रतिनिधी) नव्याने सुरू झालेल्या खान्देश एक्स्प्रेसला चोरट्यांनी आपले लक्ष्य केले असून या एक्स्प्रेसमधील अनेक प्रवाशांच्या बॅगा आणि मौल्यवान वस्तू चोरीला जात आहेत. त्यामुळे रेल्वे गाड्यांमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याप्रकरणी नवापूर व नंदुरबार लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबईहून गुजरातमधील अमळनेरकडे येणाऱ्या खान्देश एक्स्प्रेसच्या (रेल्वे क्र. ०९०५१) त्रिस्तरीय वातानुकूलित डब्यातून १५ प्रवाशांच्या बॅगा चोरीला गेल्या. यामध्ये अमळनेरच्या काही प्रवाशांचाही समावेश आहे.ही गाडी 27 जुलै रोजी दुपारी 12.30 वाजता दादर स्थानकातून सुटली. गुजरातमधील बेस्टन स्टेशनवर पोहोचल्यानंतर लोकांच्या बॅगा हरवल्या. यामध्ये अमळनेरचे सीए नीरज अग्रवाल व इतर प्रवाशांच्या बॅगाही लुटण्यात आल्या. नीरज अग्रवाल यांची बॅग आणि मोबाईल फोनही चोरीला गेला आहे.
नवसारी ते बारडोली दरम्यान या गाडीत आरपीएफची व्यवस्था नाही. गेल्या 15 दिवसांत अशा घटना 6 वेळा घडल्या आहेत. नीरज अग्रवाल यांनी रेल्वेकडे तक्रार केली असून रेल्वे पोलिसांनी चोरटय़ांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. या ट्रेनमधून प्रवास करताना प्रवाशांनी आपल्या सामानाची काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.दरम्यान प्रवाशांनी आपल्या सामानाची काळजी घ्यावी असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.