धरणगाव तालुक्यातील घटना सकाळी उघडकीस
जळगाव (प्रतिनिधी) : धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथे एका ३७ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना गुरुवार दि. २ जून रोजी सकाळी उघडकीस आली आहे. याप्रकरणी पाळधी दुरक्षेत्र पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.
जयेश सुभाष तायडे (वय ३७, रा. बांभौरी प्रचा ता. धरणगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो बांभोरी गावांमध्ये आई-वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी यांच्यासह राहत होता. आयशर वाहनावर चालक म्हणून तो काम करीत होता. त्यावरच तो परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. दरम्यान गुरुवारी दि. ६ जून रोजी तो सकाळी घरी असताना त्याने राहत्या घरी छताला गळफास लावून आत्महत्या केली. कुटुंबीयांना समजताच त्यांनी त्याला शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशांत निकुंभ यांनी त्याला तपासून मयत घोषित केले.
यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. घटनेची पाळधी दुरुक्षेत्र पोलीस स्टेशनला नोंद करण्याचे काम सुरू होते.दरम्यान तरुणाच्या आत्महत्येने बांभोरी प्र.चा. गावामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.