जळगाव (प्रतिनिधी) – लॉकडाऊनच्या काळात रिक्षा चालकांचा व्यवसाय बंद असल्यामुळे त्यांना आर्थिक परिस्थितीला सामोरे जावे लागत असुन शासनाने रिक्षा चालकांना तातडीने दहा हजार रूपये आणि किराणा साहित्य देण्याची व्यवस्था करावी अशी मागणी नेताजी सुभाषचंद्र बोस रिक्षा युनियन आणि आटोरिक्षा चालक-मालक संघटना कृती समिती महाराष्ट्रतर्फे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे आज निवेदनाव्दारे करण्यात आली. यावेळी पालकमंत्र्यांनी आश्वासन दिल्याची माहिती नेताजी सुभाषचंद्र बोस रिक्षा युनियनचे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद सोनवणे यांनी सांगितले. राज्यात 15 लाख तर जिल्ह्यात 15 ते 20 हजार रिक्षा चालक आहेत. त्यांच्यावर बेरोजगारीची कुर्हाड कोसळली असून त्यांचा व्यवसाय ठप्प झाला आहे. रिक्षा चालक व त्यांच्या कुटूंबियांची उपासमारी होत असून त्यांना 10 हजार रूपये अनुदान देवून रेशन किट द्यावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी निवेदन देतांना जिल्हाध्यक्ष प्रल्हाद सोनवणे, उपाध्यक्ष प्रमोद वाणी, नईम खाटीक, सुनिल जाधव, नाना सोनवणे, अनिल सोनवणे, विठ्ठल ठाकुर, सलिम भांजे, भैय्या पेंटर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.