जळगांव:-हरी विठ्ठल नगरातील एक ३८ वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने प्रशासनाने राजपूत गल्ली चार दिवसांपासून सील केली असली तरी या ठिकाणी राहणाऱ्या ३० कुटुंबांचे अन्न्धान्यावाचून हाल होत असून लोकप्रतिनिधी आणि सामाजिक संस्थांकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप या गल्लीत राहणाऱ्या रहिवाशांनी केला असून किमान अन्नधान्याची व्यवस्था शासन , लोकप्रतिनीधी आणि सामाजिक संस्थानी करावी अशी आर्त हाक येथील रहिवाशांनी केली आहे . हा भाग हातावर पोट असणाऱ्या सामान्य गरीब मजूर वर्गाचा असल्याने सर्वांचेच हाल होत आहे. त्यांना मदत करावी अशी मागणी रिपाइं आठवले गटाचे जिल्हा सरचिटणीस आणि आयटी सेल प्रमुख मिलिंद तायडे यांनी केली आहे.
राजपूत गल्लीत सर्वच हात मजूर आहेत प्लम्बर , मिस्तरी, गवंडी,वायरमन ,माळी, इत्यादी कामगार वर्ग पुरुष तर सर्वच महिला भांडी धुनी करून आपल्या आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करणारे आहेत . धान्य मिळविण्यासाठी या प्रभागातील नगरसेविकांना कॉल करून देखील रेशनिंगचे धान्यसुद्धा उपलब्ध करून देण्यात आले नसल्याची प्रतिक्रिया येथील रहिवाशांनी केली आहे. तसेच काहींकडे असणारे धान्य आणि पैसे संपल्याने त्यांच्यावर बिकट वेळ आली आहे . तरी प्रशासनाने येथील रहिवाशांना जीवनावश्यक साहित्य उपलब्ध करून द्यावे अशी मागणी केली जात आहे . तसेच पाणीसुद्धा पुरेसे मिळत नसल्याची तक्रार रहिवाशांनी सोशल मीडियाद्वारे व्यक्त केली आहे .
वंदनाबाई वाघोदकर १)रोज कमवणे रोज खाणे चार दिवस बंद असल्याने उपासमारीची वेळ आली आहे. उद्या उठून काहीही बरे वाईट झाले तर जवाबदार कोण? असा सवाल वंदनाबाई वाघोदकर यांनी केला आहे.
अशोक पातुडे -२) हातावर पोट आहे . आज माझ्या परिवारावर उपवास मारीची वेळ आली साहेब मदत मिळेल का ?
शानुबाई -३ ) घरकाम करूण परिवाराची भूक भागवत असते. मला सर्वांनी कामावर येऊ नये असे सांगून माझं काम बंद केलंय . कुणाच्या ही संपर्कात न येता घर -काम वेतिरिक्त कुठंही जाण येणं नाही मग मला शिक्षा कसली ? परिवाराचे काय होणार अन्नधान्य कुठून आणायचे ?
जिजाबाई पाटील- ४) माझं लक्ष लागले रस्तावर कोणी देवरूपी येईल मदतीला पण अद्याप कोणीही आलेले नाही.