मुंबई (वृत्तसंस्था) – कोरोना विषाणू संसर्गामुळे देशावर ओढवलेल्या आर्थिक संकटातून देशवासियांना बाहेर काढण्यासाठी आज मोदी सरकारतर्फे २० लाख कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज जाहीर करण्यात आले. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर देशवासीयांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबतची घोषणा केली.

दरम्यान, यावर आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘लोकांच्या हातात पैसे नाही व बेरोजगारीने रौद्ररूप धारण केलंय. हा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य व केंद्र सरकारने गुंतवणूक ओरिएंटेड सबसिडी देण्यापेक्षा रोजगार ओरिएंटेड सबसिडी देण्याची गरज आहे. दोन्ही सरकारांनी याचा विचार करावा’
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेली स्वावलंबी भारताची संकल्पना व त्यासाठी जाहीर केलेल्या 20 लाख कोटी रुपयांच्या विशेष आर्थिक पॅकेजचं स्वागत आहे. याबाबत अर्थमंत्री निर्मला सीतारमन लवकरच तपशील जाहीर करतील. पण खऱ्या अर्थाने ‘मेक इन इंडिया’साठी उचललेलं हे पाऊल ठरावं, अशी अपेक्षा रोहित पवारांनी व्यक्त केली.
Rohit Pawar
✔
@RRPSpeaks
लोकांच्या हातात पैसे नाही व बेरोजगारीने रौद्ररूप धारण केलंय.हा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य व केंद्र सरकारने गुंतवणूक ओरिएंटेड सबसिडी देण्यापेक्षा रोजगार ओरिएंटेड सबसिडी देण्याची गरज आहे.दोन्ही सरकारांनी याचा विचार करावा.@nsitharaman @AjitPawarSpeaks@Subhash_Desai @iAditiTatkare
521
9:06 AM – May 13, 2020
Twitter Ads info and privacy
52 people are talking about this







