जळगाव (प्रतिनिधी) – शास्त्रीय पध्दतीने जपमाळ केल्यास त्याचा मानवी जीवनात प्रभाव पडून जिवनातील कष्ट दूर होतात असे प्रतिपादन शास्त्री नयनप्रकाशदासजी यांनी आज केले.
येथील स्वामीनारायण मंदिरात १९ व्या रती सभेचे आयोजन मुख्यप्रवर्तक गोविंदप्रसादजी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. यावेळी रूद्राक्ष, तुलसी, वैजयंती, स्पटीका, हळद, कमगटटा आणि रत्नादिपची जपमाळांचा विधी सारखाच फक्त मानवाने कार्यसिध्दीनुसार निवड केली पाहीजे. कठीण परिस्थीतीत जपमाळेने शक्ती येते त्याचप्रमाणे जप करतांना संख्यामध्ये त्रुटी न होण्याच्या दृष्टीने जपमाळ महत्वाची मानली जाते. रामकृष्ण परमहंस यांच्या मतानुसार मनुष्याने एकाग्रतेने जपमाळ केली तर इश्वराचा साक्षात्कार होउन दर्शंन होते असे सांगीतले. पुढे बोलतांना त्यांनी जपमाळेचे नियम व जपमाळ करण्याची पध्दती विषद करतांना वरील उदाहरणे दिली याचबरोबर जपमाळ करतांना कटकट, जुन्या दोरीत ओवलेली,तुटलेली अशी जपमाळ करू नये असे देखिल सांगीतले. जपमाळ गोशाळा, जंगल, नदीतिरावर, तसेच मंदिरात करणे योग्य असल्याचे मत व्यक्त केले. रस्त्यात,स्मशानात, दुंर्गधीच्या ठीकाणी,अंधकार आणि पापी लोकांचा सहवास असेले अशा ठिकाणी जप करणे निषीध्द मानले आहे. यात १०८ मण्याची माळ उत्तम, ५४ मण्याची मध्यम तर २७ मण्याची माळ कनिष्ट मानली जात असल्याचे देखिल त्यांनी सांगीतले याविषयी सविस्तर वर्णंन भगवान स्वामीनारायण यांचे संत शवानंद स्वामी यांनी सत्संगी जीवन ग्रंथात तृतीय प्रंंकारणात केले असल्याचे देखिल त्यांनी सांगीतले.