अमळनेर (प्रतिनिधी) – तालुक्यातील वासरे येथील एका शेतकऱ्याने गळफास लावून आत्महत्या केली याप्रकरणी मारवड पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
वासरे येथील भागवत प्रकाश पाटील (वय ५१) यांनी दिनांक ९ रोजी पहाटे ६ वाजेपूर्वी गावाबाहेरील अमरधाम जवळील निंबाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. सदर घटना उघडकीस आल्यानंतर ग्रामस्थांनी त्यांना अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मृत भागवत पाटील
यांच्याकडे दोन बिघे कोरडवाहू शेती असून त्याच्यावरच त्यांचा व पत्नीचा उदरनिर्वाह सुरु होता. त्याच्या मुलाचा काही वर्षांपूर्वी अपघातात मृत्यू झाला होता व मुलीचे लग्न झाले असून त्यांच्या पश्चात आता पत्नी, मुलगी आणि जावई असा परिवार आहे. याप्रकरणी मारवड पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पो.हे. कॉ. मुकेश साळुंखे हे करीत आहेत.