जळगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील सुनसगाव येथील सुदर्शन पेपर मील ला दि.२८ रोजी सकाळी १० वाजता आग लागली होती. या भीषण आगीमुळे मोठ्या प्रमाणात कंपनीचे नुकसान झाले आहे. ही आग आटोक्यात आणण्यासाठी जवळपास ५५ ते ६० अग्निशामक दलाचे बंब लागले असून आता जेसीबी व ट्रॅक्टरव्दारे आगीच्या ठिकाणाहून साहित्य बाजूला नेण्याचे काम सुरू आहे. मात्र अजूनही आगीची धगधग सुरुच आहे .
सुनसगाव येथील ही पेपर मिल तालुक्यासह जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. यंदा या मिलमध्ये लागलेली आग ही अग्निशमन दलासाठी आव्हान ठरली आहे. गेल्या २४ तासापासून सतत पाणी मारले जात आहे. परंतु वाऱ्याचा जोर कायम असल्याने पाणी मारुनही आग पुर्णपणे आटोक्यात आलेली नाही. आताही आगेची धग सुरू आहे. त्यामुळे टॅंकर ने पाणी मारणे सुरूच आहे. ही आग पुर्णपणे आटोक्यात येण्यासाठी आणखी चार दिवस लागणार असल्याचे सांगितले जात आहे. कंपनीचे कामगार दिवसरात्र कामाला लागले असून जो तो आपापल्या परीने प्रयत्न करताना दिसत आहेत.
कंपनीचे करोडो रुपयांचे नुकसान झाले असून पंचनामा मंडळ अधिकारी व तलाठी यांनी केला असून तसा अहवाल तहसीलदार यांच्याकडे सादर करण्यात आला आहे.