• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

विधानसभा अध्यक्षांसमोर होणार शिंदे सरकारची खरी परीक्षा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची प्रतिक्रिया

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 11, 2023
in Uncategorized
0
विधानसभा अध्यक्षांसमोर होणार शिंदे सरकारची खरी परीक्षा

मुंबई (प्रतिनिधी) – राज्यातील सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालानंतर शिंदे सरकार जरी वाचलं तरी त्यांना सत्तेत राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. जयंतराव पाटील यांनी माध्यमांसमोर व्यक्त केले. राज्यपालांनी घेतलेले सर्व निर्णय कसे चुकीचे होते हे सुप्रीम कोर्टाने सांगितले. भरत गोगावले यांचा व्हीप अमान्य केला असल्याने विधानसभेत शिंदे गटाच्या सदस्यांनी जी कृती केली ती अवैध ठरणार आहे. त्यामुळे विधानसभेच्या अध्यक्षांना निर्णय घेताना सुप्रीम कोर्टाने ज्या मुद्द्यांची नोंद केली त्या चौकटीत राहून काम करावे लागेल, यामध्ये विधानसभा अध्यक्ष वेळकाढूपणा करू शकणार नाहीत, असे ते म्हणाले.

शिंदे सरकार वाचलं हा सत्तेच्या भोवती गोळा झालेल्यांचा क्षणिक आनंद राहू शकतो. कसेबसे शिंदे सरकार वाचले ही आनंदाची भावना त्यांना वाटू शकते. पण हे सर्व अवैध, घटनाबाह्य आहे. यातून भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रात केलेली कृती कशी चुकीची आहे, तसेच घटनेची पायमल्ली कशाप्रकारे झाली हे राज्यातील जनतेला सुप्रीम कोर्टाने सांगितले. राज्यातील सर्व राजकीय परिस्थिती पाहून उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर महाविकास आघाडीला पुन्हा सत्तेत बसण्याची संधी मिळाली असती असे कोर्टाने सांगितले. यातून सुप्रीम कोर्टाच्या मनात काय होते हे स्पष्ट होते.

तत्कालीन राज्यपालांच्या भूमिकेवर सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढले. राज्यपालांना जसा माणूस भेटेल तसे ते मार्गदर्शन करत होते. त्यांना योग्य संधी मिळाली तेव्हा कायद्याची पायमल्ली करून आमचं सरकार घालवण्यासाठी राज्यपाल महोदयांनी फार मोठा हातभार लावला, असा थेट आरोप जयंतराव पाटील यांनी केला.

राज्यातील सरकार हे बेकायदेशीर आहे हे सिद्ध झाल्याने राज्यात सत्ता कोणाची हे जनतेला महत्त्वाचे नाही. राज्यातील जनता महाविकास आघाडीच्या मागे खंबीरपणे होती त्यांना या निर्णयामुळे अधिकची शक्ती मिळेल, असा विश्वास प्रदेशाध्यक्षांनी व्यक्त केला.

कोर्टाच्या निकालानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडून नैतिकतेची अपेक्षा करणे अन्यायकारक होईल असे वाटते. ज्यावेळी त्यांनी सरकार स्थापन केले त्यावेळी कोणतीही नैतिकता नव्हती. त्यामुळे पुन्हा नैतिकतेबद्दल बोलणे योग्य वाटत नाही. हे सरकार टिकवणे आणि मुख्यमंत्री म्हणून राहणे यालाच त्यांची प्राथमिकता असेल तर ते राजीनामा देणार नाहीत. मात्र त्यांनी काय करावे हा सल्ला देण्याचा विरोधी पक्षाला अधिकार नाही, असे त्यांनी सांगितले.


 

 

Tags: #mumbia newshttps://kesariraj.com/11-may-23-n-5/
Previous Post

एकनाथ शिंदेंना जळगाव पुन्हा ठरले भाग्यवान

Next Post

परभणी येथे होणार अखिल भारतीय मराठी गझल संमेलन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
परभणी येथे होणार अखिल भारतीय मराठी गझल संमेलन

परभणी येथे होणार अखिल भारतीय मराठी गझल संमेलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

24 दुचाकी चोरणाऱ्या दोन पळालेल्या आरोपींना फिल्मिस्टाईल अटक
1xbet russia

24 दुचाकी चोरणाऱ्या दोन पळालेल्या आरोपींना फिल्मिस्टाईल अटक

November 21, 2025
सिंधी समाजाचा ठाम विश्वास : “चाळीसगावच्या विकासासाठी भाजपालाच साथ” – आमदार मंगेश चव्हाण
1xbet russia

सिंधी समाजाचा ठाम विश्वास : “चाळीसगावच्या विकासासाठी भाजपालाच साथ” – आमदार मंगेश चव्हाण

November 21, 2025
जळगाव बायपासवर मालवाहू ट्रक कलंडला! 
1xbet russia

जळगाव बायपासवर मालवाहू ट्रक कलंडला! 

November 21, 2025
जळगाव शहरातील दिक्षित वाडीतून मध्यरात्री कार लंपास
1xbet russia

जळगाव शहरातील दिक्षित वाडीतून मध्यरात्री कार लंपास

November 21, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

24 दुचाकी चोरणाऱ्या दोन पळालेल्या आरोपींना फिल्मिस्टाईल अटक

24 दुचाकी चोरणाऱ्या दोन पळालेल्या आरोपींना फिल्मिस्टाईल अटक

November 21, 2025
सिंधी समाजाचा ठाम विश्वास : “चाळीसगावच्या विकासासाठी भाजपालाच साथ” – आमदार मंगेश चव्हाण

सिंधी समाजाचा ठाम विश्वास : “चाळीसगावच्या विकासासाठी भाजपालाच साथ” – आमदार मंगेश चव्हाण

November 21, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon