जळगाव ( प्रतिनिधी ) – शौकखातर दारु पिण्याला सवय होते, कालातरांने दारु रोज लागते, त्यानंतर व्यक्ती कामधंदे विसरुन दिवस – रात्र दारुच्या नशेत धुंद होतो आणि डोक्यावरही कर्जाचा डोंगर उभा राहतो. अशी जवळपास सर्वच दारु पिणार्यांची हिस्ट्री असून सदर २५ जणांवर डॉ.उल्हास पाटील रुग्णालयातील केंद्र शासन मान्य संकल्प व्यसनमुक्ती केंद्रात १५ दिवस उपचार करण्यात आले. रुग्णाची मनाची इच्छा, औषधोपचारांचा प्रभाव आणि मित्रासारखे डॉक्टरांचे समुपदेशन यामुळे अनेकांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळत आहे.
केंद्र शासन मान्य संकल्प व्यसनमुक्ती केंद्राची स्थापना ३ मार्च २०२३ रोजी करण्यात आली. येथे निष्णात डॉ.विलास चव्हाण, डॉ.गोविंद यादव, डॉ.आदित्य, समुपदेशक बबन ठाकरे यांच्यासहीत पाच डॉक्टरांच्या टिमद्वारे रुग्णांवर उपचार केले जातात. ७ हजार रुपयात १५ दिवस उपचार होत असून या कालावधीत रुग्णाचे समुपदेशन व आवश्यक औषधोपचार केले जातात. रुग्णांची स्वतंत्र अशी दिनचर्याही येथे करण्यात आली असून दारुचे व्यसन सोडविण्यासाठी आलेल्या रुग्णांना प्रोत्साहन मिळत आहे. केंद्रस्थानेपासून आतापर्यंत २५ रुग्णांवर उपचार पद्धती यशस्वी झाली असून आता दारु पिणार नाही, असा संकल्प करुनच येथून रुग्ण आनंदाने घरी जातात.
दारुमुळे रुग्णांचे लिवर खराब होते, पोटदुखी, पोटात पाणी होणे, झोप न येणे, चिडचिड होणे, उलट्या होणे, जेवण न जाणे असे त्रास रुग्णास होतात. दारु सोडवायची असल्यास डॉ.उल्हास पाटील रुग्णालयातील संकल्प केंद्रातील निवासी डॉ.आदित्य यांच्याशी ९४०४४७६१११ या क्रमांकावर संपर्क साधावा.