जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव सुवर्णनगरी म्हणून ओळखली जाते. मात्र येथे काही दगड निपजले. शिवसेनेच्या सभेत घुसू अशी धमकी गद्दारांनी दिली. मात्र छातीत हिम्मत लागते. गद्दारांमध्ये ती नाही. घुसून दाखवा म्हणे. घुसलो की, इथपर्यंत आलो. अजून किती घुसायचे अशा शब्दात घणाघात करीत खासदार संजय राऊत यांनी, कडवट शिवसैनिकांच्या नदी लागू नका असा इशाराहि त्यांनी दिला.
जळगावात गुलाबो गॅंग स्थापन झाली आहे. मात्र पाचोरा कडवट शिवसैनिकांचे आहे. आर. ओ. तात्यांनंतर वैशाली ताई ह्या वारसा चालवतील. पुतण्यांनी राज्यात फार घोटाळा केलाय. पाचोऱ्यातही एका पुतण्याने ते केले आहे. मात्र लोकसभा व विधानसभेवर भगवाच फडकेल, असेही खा. राऊत म्हणाले.