• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

अन्यायी ब्रिटिशांविरुद्ध बंड पुकारणारे आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके !

वासुदेव बळवंत फडके स्मृतीदिन : 17 फेब्रुवारी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 11, 2023
in Uncategorized
0
अन्यायी ब्रिटिशांविरुद्ध बंड पुकारणारे आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके !

17 फेब्रुवारी. वासुदेव बळवंत फडके यांचा स्मृतीदिन.  ब्रिटिश सरकारच्या अन्यायाविरुद्ध बंड पुकारणारे आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या  स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या कार्यावर थोडक्यात टाकलेला प्रकाश !!


वासुदेवांचा जन्म
वासुदेवांचा जन्म शिरढोण (जि.रायगड) येथे 1845 या वर्षी झाला. त्यांचे आजोबा अनंतराव हे कर्नाळा किल्ल्याचे किल्लेदार होते. 1818 मध्ये इंग्रजांनी तो त्यांना रिकामा करून देण्यास सांगितले. ते नाकारून त्यांनी इंग्रजांशी सतत तीन दिवस लढाई केली. अशा आजोबांच्या स्वातंत्र्य प्रीतिचा वारसा घेऊन वासुदेव जन्माला आले. त्यांची घरची श्रीमंती होती. वैभवात जन्मलेले वासुदेव गोर्‍यापान वर्णाचे, सरळ नाकाचे, पाणीदार निळसर डोळ्यांचे आणि सुदृढ शरीरयष्टी असलेले तगडे वीर होते. 

नोकरीत असतांना ब्रिटिशांच्या सैन्य व्यवस्थेची माहिती मिळवणे
शिक्षणानंतर मुंबईत जी.आय्.पी. रेल्वेत ग्रँट मेडीकल महाविद्यालयात वासुदेवांनी काही काळ चाकरी केली; पण वरिष्ठांशी खटका उडून त्यांनी ती चाकरी सोडली आणि मिलीटरी फायनान्स कार्यालयात चाकरी धरली. 1865 या वर्षी त्यांचे पुणे येथे  स्थानांतर (बदली) झाले, त्यावेळी त्यांना 60 रुपये मासिक वेतन होते आणि त्यांच्या कामावर वरिष्ठ इंग्रज अधिकारी खूश असत. सैनिकी विभागाशी संबंध असल्यामुळे ब्रिटिशांच्या सैन्य व्यवस्थेची बरीचशी माहिती त्यांना आपोआपच मिळाली.

अन्यायी ब्रिटिशांविरुद्ध चीड निर्माण होणे
1870 या वर्षी वासुदेवांना आई अत्यवस्थ असल्याचे वृत्त शिरढोणहून कळले. तिला भेटण्यासाठी त्यांनी कार्यालयातून सुट्टी मागितली; पण ती त्यांना मिळाली नाही. उलट अपशब्द ऐकावे लागले. वासुदेव तसेच आईच्या भेटीला निघून गेले; पण ते तेथे पोहचण्याआधीच आई मृत्यू पावली होती. आपल्या आईची शेवटची भेट होऊ न देणारा इंग्रज अधिकारी आणि एकंदर इंग्रज यांच्या विरोधात त्यांचे मन फार प्रक्षुब्ध झाले. 

स्वदेशी वस्तू वापरण्याची शपथ घेणे
1871 या वर्षी पुण्यात काकांनी सार्वजनिक सभेच्या माध्यमातून जनतेची गार्‍हाणी दूर करण्यासाठी आघाडी उघडली.  वासुदेवांनी त्यांच्या या कार्यात भाग घेतला. 1873 मध्ये काकांनी खादी वापरण्याचे व्रत घेतले, तेव्हा वासुदेवांनीही फक्त स्वदेशी वस्तू वापरण्याची शपथ घेतली आणि ती आजन्म पाळली.

गुप्त संघटना स्थापन करणे
वासुदेव बळवंत फडके सुट्टीच्या दिवशी जवळच्या खेड्यापाड्यांत जाऊन स्वदेश आणि स्वातंत्र्य यांवर व्याख्याने देत फिरू लागले. गरीब जनतेची दु:खे जवळून पाहू लागले. ‘इंग्रजी राजवटीमुळेच तुमची ही अशी दैना आहे’, असे ते शेतकर्‍यांना सांगू लागले. त्यांनी पुण्यात तरुणांसाठी तलवार आणि दांडपट्टा चालवण्याचा अन् मल्लविद्या शिकवण्याचा वर्ग काढला. तो गुप्तपणे रात्री किंवा पहाटे नरसोबाच्या देवळापलीकडे निवांत जागेत चाले. त्यात शे-दीडशे तरुण येत. त्यात शरीर कमवण्यासाठी एक वर्ष अभ्यासाला सुट्टी देणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हेही होते. या तरुणांतून तापून सुलाखून निघालेल्या निवडक तरुणांची त्यांनी एक गुप्त संघटना स्थापन केली. प्रभात फेर्‍यांमधून, शाळा महाविद्यालयांना दिलेल्या भेटींतून आणि भक्तीपर कार्यक्रमांतून ते आणि त्यांचे सहकारी आपल्या कार्याचा प्रचार करत. दसर्‍याला रास्त्यांच्या वाड्यात शस्त्रपूजनाचा मोठा समारंभ होई. त्या वेळी दही-पोह्यांचा द्रोण हातात घेऊन स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण करण्याची प्रतिज्ञा हे सभासद घेत. इंग्रजांचे हे राज्य उलथून स्वातंत्र्य मिळवल्याखेरीज देशाचे भले होणार नाही, अशी त्यांची खात्री झाली आणि त्यांच्या मनात बंडाचे विचार चालू झाले. ते आत्मवृत्तात म्हणतात, ‘ज्या भूमीच्या पोटी आपण जन्मलो, तिच्याच पोटी ही सारी लेकरे झाली, त्यांनी अन्नावाचून उपाशी मरावे आणि आपण कुत्र्याप्रमाणे पोट भरत रहावे, हे मला पहावले नाही, म्हणून मी ब्रिटीश सरकारविरुद्ध बंड पुकारले.’
ब्रिटीशांविरुद्ध बंड
ही वेळ राजकीय बंडाची म्हणजे दरोडे घालून राज्यसत्तेला आव्हान देण्याचीच होती. शिवाजी महाराजांनी मोगल राजवटीविरुद्ध प्रथम तेच केले होते. 1879 च्या फेब्रुवारीत शिवरात्रीच्या मुहुर्तावर रामोशी, मांग इत्यादी लोक आणि काही पांढरपेशे लोक अशा दोन-तीनशे लोकांच्या सेनेसह त्यांनी थामारी गावावर पहिला दरोडा घातला. त्यानंतर त्यांनी घातलेल्या एका मागून एक अशा अनेक दरोड्यांमुळे इंग्रज सरकार चक्रावून गेले.


ब्रिटीशांच्या कह्यात सापडणे
जून 1879 मध्ये ते गाणगापूरात परतले. नजीकच रहाणार्‍या रोहिल्यांशी 500 घोडेस्वारांची नवी सेना उभारण्याचा करार केला आणि पैसे आणण्यासाठी ते पंढरपुरात निघाले. तेव्हा त्यांना पकडण्यासाठी 1500 हिंदी आणि गोरे सैनिक मेजर डॅनिअलच्या हाताखाली सतत खपत होते. हेरांकडून डॅनिअलला त्यांचा सुगावा लागला. सतत 42 घंट्यांच्या पाठलागानंतर त्यांना देवरनावडगी येथे 20 जुलैच्या मध्यरात्री निद्रिस्त असता अटक करण्यात आली. पकडल्यानंतरही डॅनिअलला द्वंद्वयुद्धाचे आव्हान त्यांनी दिले; पण त्याने ते स्वीकारले नाही. त्यांच्या बंडाच्या माहितीसाठी त्यांचा अतोनात छळ करण्यात आला. पुण्याच्या सत्र न्यायालयात त्यांच्यासह 16 जणांवर इंग्रज शासनाविरुद्ध ‘सशस्त्र बंड पुकारण्याचा, कट केल्याचा, त्यासाठी माणसे आणि शस्त्रे गोळा केल्याचा, शासनाच्या विरोधात राजद्रोह पसरवण्याचा आणि दरोडे घालण्याचा’ असे आरोप ठेवण्यात आले.

ब्रिटीशांकडून कारागृहात अतोनात हाल आणि मृत्यू
फडकेंच्या स्वप्नाला आणि ध्येयाला पेलेल असा प्रतिसाद न मिळाल्यामुळे या आद्यक्रांतीकारकांच्या नशिबी जन्मठेप, काळेपाणी, एडनचा कारागृह, तेथे तेलाचा घाणा चालवणे, चक्की पिसणे असे भोग आले. त्यांचे तेथे हालहाल करण्यात आले, मांसाहार करत नाहीत म्हणून उपाशी ठेवण्यात आले. दीड वर्षातच म्हणजे 12 ऑक्टोबर 1880 या दिवशी मध्यरात्री त्यांनी आपल्या बेड्या तोडून, कोठडीची जड दारे उखडून, कारागृह फोडून पलायन केले. ते बारा मैल तसेच पळत होते. दुसर्‍या दिवशी मोठ्या प्रमाणात पोलीस आणि सोजीर त्यांच्या पाठलागावर निघाले आणि दुपारी 3 वाजता त्यांना वीर आनंद या ठिकाणी पकडून परत कारागृहात आणले. मग जडातील जड बेड्या, एकाकी कोठडी आणि छळ चालू झाला. त्यांचे भीमकाय शरीर खंगत गेले. क्षयाने ते जर्जर झाले आणि वयाच्या केवळ अडतिसाव्या वर्षी 17 फेब्रुवारी 1883 या दिवशी सायंकाळी 4.20 वाजता त्यांनी देह ठेवला.

अन्यायी ब्रिटिशांविरुद्ध बंड पुकारणारे आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांना स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन !

 

संकलक : श्री. प्रशांत जुवेकर

जळगाव जिल्हा समन्वयक,

हिंदु जनजागृती समिती

संपर्क क्र. : 9552426439

17 फेब्रुवारी. वासुदेव बळवंत फडके यांचा स्मृतीदिन.  ब्रिटिश सरकारच्या अन्यायाविरुद्ध बंड पुकारणारे आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या  स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या कार्यावर थोडक्यात टाकलेला प्रकाश !!


वासुदेवांचा जन्म
वासुदेवांचा जन्म शिरढोण (जि.रायगड) येथे 1845 या वर्षी झाला. त्यांचे आजोबा अनंतराव हे कर्नाळा किल्ल्याचे किल्लेदार होते. 1818 मध्ये इंग्रजांनी तो त्यांना रिकामा करून देण्यास सांगितले. ते नाकारून त्यांनी इंग्रजांशी सतत तीन दिवस लढाई केली. अशा आजोबांच्या स्वातंत्र्य प्रीतिचा वारसा घेऊन वासुदेव जन्माला आले. त्यांची घरची श्रीमंती होती. वैभवात जन्मलेले वासुदेव गोर्‍यापान वर्णाचे, सरळ नाकाचे, पाणीदार निळसर डोळ्यांचे आणि सुदृढ शरीरयष्टी असलेले तगडे वीर होते. 

नोकरीत असतांना ब्रिटिशांच्या सैन्य व्यवस्थेची माहिती मिळवणे
शिक्षणानंतर मुंबईत जी.आय्.पी. रेल्वेत ग्रँट मेडीकल महाविद्यालयात वासुदेवांनी काही काळ चाकरी केली; पण वरिष्ठांशी खटका उडून त्यांनी ती चाकरी सोडली आणि मिलीटरी फायनान्स कार्यालयात चाकरी धरली. 1865 या वर्षी त्यांचे पुणे येथे  स्थानांतर (बदली) झाले, त्यावेळी त्यांना 60 रुपये मासिक वेतन होते आणि त्यांच्या कामावर वरिष्ठ इंग्रज अधिकारी खूश असत. सैनिकी विभागाशी संबंध असल्यामुळे ब्रिटिशांच्या सैन्य व्यवस्थेची बरीचशी माहिती त्यांना आपोआपच मिळाली.

अन्यायी ब्रिटिशांविरुद्ध चीड निर्माण होणे
1870 या वर्षी वासुदेवांना आई अत्यवस्थ असल्याचे वृत्त शिरढोणहून कळले. तिला भेटण्यासाठी त्यांनी कार्यालयातून सुट्टी मागितली; पण ती त्यांना मिळाली नाही. उलट अपशब्द ऐकावे लागले. वासुदेव तसेच आईच्या भेटीला निघून गेले; पण ते तेथे पोहचण्याआधीच आई मृत्यू पावली होती. आपल्या आईची शेवटची भेट होऊ न देणारा इंग्रज अधिकारी आणि एकंदर इंग्रज यांच्या विरोधात त्यांचे मन फार प्रक्षुब्ध झाले. 

स्वदेशी वस्तू वापरण्याची शपथ घेणे
1871 या वर्षी पुण्यात काकांनी सार्वजनिक सभेच्या माध्यमातून जनतेची गार्‍हाणी दूर करण्यासाठी आघाडी उघडली.  वासुदेवांनी त्यांच्या या कार्यात भाग घेतला. 1873 मध्ये काकांनी खादी वापरण्याचे व्रत घेतले, तेव्हा वासुदेवांनीही फक्त स्वदेशी वस्तू वापरण्याची शपथ घेतली आणि ती आजन्म पाळली.

गुप्त संघटना स्थापन करणे
वासुदेव बळवंत फडके सुट्टीच्या दिवशी जवळच्या खेड्यापाड्यांत जाऊन स्वदेश आणि स्वातंत्र्य यांवर व्याख्याने देत फिरू लागले. गरीब जनतेची दु:खे जवळून पाहू लागले. ‘इंग्रजी राजवटीमुळेच तुमची ही अशी दैना आहे’, असे ते शेतकर्‍यांना सांगू लागले. त्यांनी पुण्यात तरुणांसाठी तलवार आणि दांडपट्टा चालवण्याचा अन् मल्लविद्या शिकवण्याचा वर्ग काढला. तो गुप्तपणे रात्री किंवा पहाटे नरसोबाच्या देवळापलीकडे निवांत जागेत चाले. त्यात शे-दीडशे तरुण येत. त्यात शरीर कमवण्यासाठी एक वर्ष अभ्यासाला सुट्टी देणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हेही होते. या तरुणांतून तापून सुलाखून निघालेल्या निवडक तरुणांची त्यांनी एक गुप्त संघटना स्थापन केली. प्रभात फेर्‍यांमधून, शाळा महाविद्यालयांना दिलेल्या भेटींतून आणि भक्तीपर कार्यक्रमांतून ते आणि त्यांचे सहकारी आपल्या कार्याचा प्रचार करत. दसर्‍याला रास्त्यांच्या वाड्यात शस्त्रपूजनाचा मोठा समारंभ होई. त्या वेळी दही-पोह्यांचा द्रोण हातात घेऊन स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण करण्याची प्रतिज्ञा हे सभासद घेत. इंग्रजांचे हे राज्य उलथून स्वातंत्र्य मिळवल्याखेरीज देशाचे भले होणार नाही, अशी त्यांची खात्री झाली आणि त्यांच्या मनात बंडाचे विचार चालू झाले. ते आत्मवृत्तात म्हणतात, ‘ज्या भूमीच्या पोटी आपण जन्मलो, तिच्याच पोटी ही सारी लेकरे झाली, त्यांनी अन्नावाचून उपाशी मरावे आणि आपण कुत्र्याप्रमाणे पोट भरत रहावे, हे मला पहावले नाही, म्हणून मी ब्रिटीश सरकारविरुद्ध बंड पुकारले.’
ब्रिटीशांविरुद्ध बंड
ही वेळ राजकीय बंडाची म्हणजे दरोडे घालून राज्यसत्तेला आव्हान देण्याचीच होती. शिवाजी महाराजांनी मोगल राजवटीविरुद्ध प्रथम तेच केले होते. 1879 च्या फेब्रुवारीत शिवरात्रीच्या मुहुर्तावर रामोशी, मांग इत्यादी लोक आणि काही पांढरपेशे लोक अशा दोन-तीनशे लोकांच्या सेनेसह त्यांनी थामारी गावावर पहिला दरोडा घातला. त्यानंतर त्यांनी घातलेल्या एका मागून एक अशा अनेक दरोड्यांमुळे इंग्रज सरकार चक्रावून गेले.


ब्रिटीशांच्या कह्यात सापडणे
जून 1879 मध्ये ते गाणगापूरात परतले. नजीकच रहाणार्‍या रोहिल्यांशी 500 घोडेस्वारांची नवी सेना उभारण्याचा करार केला आणि पैसे आणण्यासाठी ते पंढरपुरात निघाले. तेव्हा त्यांना पकडण्यासाठी 1500 हिंदी आणि गोरे सैनिक मेजर डॅनिअलच्या हाताखाली सतत खपत होते. हेरांकडून डॅनिअलला त्यांचा सुगावा लागला. सतत 42 घंट्यांच्या पाठलागानंतर त्यांना देवरनावडगी येथे 20 जुलैच्या मध्यरात्री निद्रिस्त असता अटक करण्यात आली. पकडल्यानंतरही डॅनिअलला द्वंद्वयुद्धाचे आव्हान त्यांनी दिले; पण त्याने ते स्वीकारले नाही. त्यांच्या बंडाच्या माहितीसाठी त्यांचा अतोनात छळ करण्यात आला. पुण्याच्या सत्र न्यायालयात त्यांच्यासह 16 जणांवर इंग्रज शासनाविरुद्ध ‘सशस्त्र बंड पुकारण्याचा, कट केल्याचा, त्यासाठी माणसे आणि शस्त्रे गोळा केल्याचा, शासनाच्या विरोधात राजद्रोह पसरवण्याचा आणि दरोडे घालण्याचा’ असे आरोप ठेवण्यात आले.

ब्रिटीशांकडून कारागृहात अतोनात हाल आणि मृत्यू
फडकेंच्या स्वप्नाला आणि ध्येयाला पेलेल असा प्रतिसाद न मिळाल्यामुळे या आद्यक्रांतीकारकांच्या नशिबी जन्मठेप, काळेपाणी, एडनचा कारागृह, तेथे तेलाचा घाणा चालवणे, चक्की पिसणे असे भोग आले. त्यांचे तेथे हालहाल करण्यात आले, मांसाहार करत नाहीत म्हणून उपाशी ठेवण्यात आले. दीड वर्षातच म्हणजे 12 ऑक्टोबर 1880 या दिवशी मध्यरात्री त्यांनी आपल्या बेड्या तोडून, कोठडीची जड दारे उखडून, कारागृह फोडून पलायन केले. ते बारा मैल तसेच पळत होते. दुसर्‍या दिवशी मोठ्या प्रमाणात पोलीस आणि सोजीर त्यांच्या पाठलागावर निघाले आणि दुपारी 3 वाजता त्यांना वीर आनंद या ठिकाणी पकडून परत कारागृहात आणले. मग जडातील जड बेड्या, एकाकी कोठडी आणि छळ चालू झाला. त्यांचे भीमकाय शरीर खंगत गेले. क्षयाने ते जर्जर झाले आणि वयाच्या केवळ अडतिसाव्या वर्षी 17 फेब्रुवारी 1883 या दिवशी सायंकाळी 4.20 वाजता त्यांनी देह ठेवला.

अन्यायी ब्रिटिशांविरुद्ध बंड पुकारणारे आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांना स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन !

 

संकलक : श्री. प्रशांत जुवेकर

जळगाव जिल्हा समन्वयक,

हिंदु जनजागृती समिती

संपर्क क्र. : 9552426439


 

Tags: #hindu rashtra jagruti news #jalgaon #maharashtra #bharat#vasudev balvant fadke news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

मराविमं अधिकारी संघटनेचे ४५ वे राज्यव्यापी अधिवेशन शनिवारी अमरावतीत

Next Post

चोपडा येथे कापड दुकानात लागलेल्या आगीत एक जण जळून खाक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

चोपडा येथे कापड दुकानात लागलेल्या आगीत एक जण जळून खाक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पोलीस कर्मचाऱ्यांवर संताप : कंत्राटदाराचा मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न !
1xbet russia

पोलीस कर्मचाऱ्यांवर संताप : कंत्राटदाराचा मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न !

June 20, 2025
५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन
1xbet russia

५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

June 20, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारकाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
1xbet russia

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारकाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

June 20, 2025
कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा, पुण्यात ऑरेंज अलर्ट
1xbet russia

कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा, पुण्यात ऑरेंज अलर्ट

June 20, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पोलीस कर्मचाऱ्यांवर संताप : कंत्राटदाराचा मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न !

पोलीस कर्मचाऱ्यांवर संताप : कंत्राटदाराचा मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न !

June 20, 2025
५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

June 20, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon