जामनेर ( प्रतिनिधी ) – नाशिकमध्ये २०१२ सालात पकडलेल्या अंमली पदार्थ तस्करीच्या गुन्ह्यातील दोषींना 10 वर्ष सक्तमजूरीसह 1लाख दंड अशी शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे .
नाशिक शहरात ६ डिसेंबर २०१२ रोजी रासबिहारी ते मेरी लिंक रोडवर रमाकांत चुनिलाल बडगुजर यांचे एमएच- ०४/ बीएच – ८००८ या पजेरो गाडी ( क्र केएम २० एम-१७३७) या वाहनास टोचन करुन पजेरो गाडीत ६ किलो ९०० ग्रॅम चरस नावाचा अंदाजे रक्कम रुपये १३ लाख ८० हजार किमतीचा मनोव्यापावर परिणाम करणारा मादक पदार्थ विक्री करण्याच्या हेतूने शहरात घेवून येत असतांना मिळून आला होता
. हा माल नाशिक शहरात येत असल्याबाबत पंचवटी पोलीसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती वाकोद ( ता जामनेर) चे मूळ रहिवाशी, सध्या मुंबई रेल्वे येथे सहायक पोलीस आयुक्त पदावर कार्यरत व गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस निरिक्षक बाजीराव महाजन यांनी तत्कालीन सहाय्यक पोलीस आयुक्त गणेश शिंदे यांना माहिती देत तत्कालीन पोलीस उपआयुक्त साहेबराव पाटील यांच्याकडून कारवाईची परवानगी घेतली होती. पोलिसांनी सापळा रचुन आरोपीच्या ताब्यातुन ६ किलो ९०० ग्रॅम चरस जप्त करण्यात आला. या आरोपींविरुध्द न्यायालयात सन २०१३ मध्ये दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
या खटल्यात सरकारपक्षातर्फे ५ साक्षीदार तपासण्यात आले गुन्हा सिद्ध करण्यात आला. जप्त करण्यात आलेला माल हा चरस असल्याबाबतचा पुरावा रासायनिक प्रयोगशाळेकडून दाखल करण्यात आला. सरकारपक्षातर्फे पुरावा व युक्तीवाद ऐकून न्यायालयाने तीन आरोपींना प्रत्येकी १० वर्षे सक्त मजुरी व प्रत्येकी १ लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली व दंड न भरल्यास प्रत्येकी १ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावली. खटल्यात फिर्यादी पो नि बाजीराव महाजन व तपास अधिकारी पो नि संजय सानप, अमोल रिकामे, संजय साठे, रंजन बेंडाळे यांची साक्ष महत्वाची ठरली. न्यायालयीन कामकाजात पंचवटी पोलीस स्टेशनचे कर्मचारी व पैरवी अधिकारी श्रीमती बहिरम यांनी मदत केली. सरकारपक्षातर्फे विशेष सरकारी वकील डॉ. सुधीर एस. कोतवाल यांनी काम पाहिले.