जळगाव ( प्रतिनिधी ) – सलग ४ दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील नद्यांचे वाढलेले पाणी आणि पूर्णा नदीला आलेल्या पुरामुळे पाण्याचा ओघ वाढल्याने हतनूर धरणाचे ४१ दरवाजे आज ( दि १४ जुलै ) दुपारी १२ वाजता पूर्णपणे उघडले गेले आहेत .
हतनूर धरण प्रकल्प कार्यालयाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की , हतनूर धरणाची पाणी पातळी सध्या २०९ . ९०० मीटर्सवर आहे . या धरणातील ढोबळ जलसाठा ४९. ४८ टक्के असून १ लाख २५ हजार १५६ क्युसेक्स वेगाने धरणातून पाण्याचा विसर्ग केला जात आहे . आज सकाळापासूनच्या ४ तासांमध्ये हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात २. मी मी पावसाची नोंद झाली आहे .