जळगाव ( प्रतिनिधी ) – खाजगी वाहनातून प्रवास करताना तरुणाचा ८ हजार रुपयांचा मोबाईल वाहनातील तीन जणांनी आधी विनाकारण कानशिलात मारत चोरला आहे. जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठा येथे अमोल उखर्डू पाटील राहतो. अमोल 10 जून रोजी पिंपळकोटा येथून जळगावला येण्यासाठी एका खासगी वाहनात बसला. वाहनात अगोदरच तीन अनोळखी व्यक्ती होते. मानराज पार्क जवळ अमोल वाहनातून उतरला. यावेळी वाहनातील अनोळखीपैकी एकाने शिवीगाळ करत अमोलच्या कानशिलात लगावली. नंतर तो पुन्हा वाहनात जाऊन बसला. वाहनातून उतरलेल्या अमोलने त्याच्या खिशात हात घातला असता खिशात ठेवलेला मोबाईल आढळून आला नाही. वाहनातील तीन अनोळखी व्यक्तींनी मोबाईल चोरून नेल्याची खात्री झाल्यावर अमोल पाटील याने जिल्हापेठ पोलिसात तक्रार दिली या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पो ना गणेश पाटील करीत आहेत.