जळगाव ( प्रतिनिधी ) – कानळदा गावातून १५ वर्षीय मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना उघडकीला आली एकावर जळगाव तालुका पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव तालुक्यातील कानळदा येथे १५ वर्षीय अल्पवयीन मुलीगी कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. मुलीचे वडील शेती करून उदरनिर्वाह करतात अल्पवयीन मुलगी २२ मे रोजी सकाळी घरी असतांना ती अचानक बेपत्ता झाली. मुलीच्या पालकांनी तिचा परिसरात सर्वत्र शोध घेतला मुलगी कुठेही आढळून आली नाही. मुलीच्या वडीलांनी गावात राहणारा भावेश बळीराम बोरसे यानेच मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त केला आहे. २४ मे रोजी मुलीच्या वडीलांनी दिलेल्या फिर्यादीवरून जळगाव तालुका पोलीसात संशयित आरोपी भावेश बळीराम बोरसे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश सायकर करीत आहेत