जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव शहरातील एका भागात राहणाऱ्या ३० वर्षीय विवाहितेचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील एका भागातील ३० वर्षीय विवाहिता आपल्या पतीसह वास्तव्याला आहे. दरम्यान १२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास त्याच भागात राहणारा संशयीत आरोपी जितेंद्र बच्छाव (पूर्ण नाव माहीत नाही) हा याने महिला दळण काढण्यासाठी घराबाहेर जात असताना तिचे केस पकडून तिचा मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत तिच्या विनयभंग केला. याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या विवाहितेच्या पतीला शिवीगाळ केली व “तुमच्याकडून जे होईल ते करून घ्या, मी कोणाला घाबरत नाही, तुम्ही जास्त बोलले तर मी तुम्हाला सोडणार नाही, तुमची गाडी फोडून टाकेल, अशी धमकी दिली. या संदर्भात महिलेने पतीसह एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी जितेंद्र बच्छाव याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विजय पाटील करीत आहे.