जळगाव ( प्रतिनिधी ) – नेरी दिगर येथील जिल्हा परिषदेच्या शाळा व्यवस्थापन समितीचे पुनर्गठन करण्यात आले. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणून राजू पाटील यांचे निकटवर्तीय रवींद्र भाऊ देवकर तर उपाध्यक्ष म्हणून बबलू धनगर यांची निवड करण्यात आली.
नवीन युवकांना संधी हवी म्हणून खोडपेनी यात भाग घेणे टाळले. कार्यक्रमाला उपस्थित विद्यार्थी पाल्य ग्रामपंचायत सरपंच सुभाष मोरे उपसरपंच प्रकाश भाऊ बोरसे तर ग्रामपंचायत सदस्य विलास खोडपे, प्रभारी मुख्याध्यापिका येवले मॅडम, मंजुषा मॅडम, प्रमोद पाटील सर, वांगेकर मॅडम, मनोज कोलते आदींसह पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व समीतिचे स्वागत करून शाळेच्या विकासासाठी सदिच्छा देऊन ग्रामपंचायतच्या वतीने विलास खोडपे यांनी अध्यक्ष उपाध्यक्ष यांचे स्वागत केले.