मुंबई ( प्रतिनिधी ) – महाविकास आघाडी सरकारचा नाकर्तेपणा सांगणारे मुद्दे लिहिलेला कुर्ता परिधान करून आज चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी विधानसभेत सर्वांचे लक्ष वेधून घेतले . नन्तर त्यांनी माध्यमांशी बोलताना आपली भूमिकाही स्पष्ट केली.
‘सरकार हरवले आहे’ अशी अक्षरं प्रिंट केलेला कुर्ता घालून चाळीसगांवचे आमदार मंगेश चव्हाण यांनी आज विधानभवनात प्रवेश केला, सर्वांचे लक्ष वेधून घेत असलेल्या या कुर्त्यावर ‘ओबीसी आरक्षण, शेतकऱ्यांना वीज, पूरग्रस्तांना मदत, एम पी एस सी नियुक्त्या, नोकर भरती भ्रष्टाचार व इतर मुद्दे प्रिंट केलेले होते या सर्वच मुद्द्यांवर महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरले असल्याचे त्यांनी माध्यमांसमोर सांगत हा लक्षवेधी कुर्ता परिधान करण्यामागे असलेली आपली भूमिका स्पष्ट केली.
मागच्या बाजूला ‘वसुली सरकार धिक्कार असो’ अशा मोठ्या अक्षरात प्रिंट केलेल्या या कुर्त्यावर पुढच्या बाजूला “शेतकरी वीज मागतोय, एम पी एस सी उमेदवार नियुक्ती मागताहेत, बेरोजगार पारदर्शकपणे नोकरी मागताहेत, मराठा आरक्षण मागताहेत, ओबीसी हक्क मागतोय, पूरग्रस्त मदत मागतोय आणि
हे सर्व ज्यांनी दिल पाहिजे ते सरकार वसुली मागतय… असे लिहिलेल्या ओळी सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या.