रावेर ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील सुकी नदीच्या पात्रात बुडून ११ वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना पाल येथे काल घडली .

विवरा येथील अंजूम शेख जावेद (वय ११), हुरबानो शेख जावेद (अंजूमची आई), दोन भाऊ साद आणि उमेर, शमीमबानो (आजी), वरणगाव येथील मामी शाहिस्ताबी फजल्लोदीन, शाहिस्ताबीची मुले अमन व अलफैज असे ८ जण गुरुवारी विवरे येथून पाल येथील नातेवाईक अकबर शेख शब्बीर यांच्याकडे गेले. तेथून अकबर यांची तीन मुले जिशान (वय १२), सारा आणि अलिया असे ११ जण पाल येथील हरीण पैदास केंद्र पाहायला गेले होते.
हे सर्व जण सुकी नदी आणि कुसुंब्री नाल्याचा संगमावर गेले तेव्हा जिशान नदीपात्रात पडला. त्याला वाचवण्यासाठी अंजूम शेख जावेद ही त्याची मावसबहिणी धावून गेल्याने ती देखील पात्रात पडली. सोबत या तीन महिलांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र सोबत असलेले सात बालके देखील पाण्यात पडली. परिसरातील मासेमारांनी तात्काळ पाण्यात उड्या घेऊन या सर्वांना वाचविले. मात्र अंजूम शेख जावेद (वय ११) या बालिकेचा मात्र बुडून मृत्यू झाला.







