जिल्ह्यातील ५ ग्रामसेवक जिल्हापेठ पोलिसांच्या ताब्यात ; दोन ग्रामसेवक गैरहजर

जळगाव (प्रतिनिधी ) – जिल्ह्यातील बोदवड, धरणगाव आणि चाळीसगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीचे ग्रामसेवकांनी सरकारी दस्तऐवज (दफ्तर ) बेकायदा ताब्यात ठेवणे प्रकरण या ग्रामसेवकांना भोवले असून जिल्हाधिकारी डॉ. अभिजित राऊत यांनी याप्रकरणाची गंभीर दाखल घेऊन सदर ८ ग्रामसेवकांवर ठपका ठेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. त्याबाबतचे आदेश बुधवारी सायंकाळी ५ वाजता जिल्हाधिकाऱ्यांनी काढले असून ५ ग्रामसेवकांना जिल्हापेठ पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांच्या ताब्यात पुढील कारवाईसाठी देण्यात आले आहे .तसेच इतर दोन ग्रामसेवक कर्तव्यात गैरहजर आढळून आले असून त्यांच्यावरही अटकेची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली .दरम्यान डी . एस . इंगळे (वडजी , ता. बोदवड जि जळगाव) यांना त्रास होत असल्याने त्यांचे दफतरताब्यात घेण्यात येऊन त्यांना चार दिवसांची संधी देण्यात आली आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १७९ नुसार अर्जदार यांनी २७ फेब्रुवारी २०२० रोजी वरील ९ ग्रामसेवकांविरुद्ध कार्यालयात विवाद अर्ज सादर केला आहे. विवाद अर्जावर निर्णय घेण्यापूर्वी संबंधितांना नोटीस बजावून म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली आहे . याबाबत सखोल चौकशी करून ग्रामपंचायत विवाद अर्ज ९ देण्यात आले ४ डिसेंबर २०२० या सर्व अर्जांवर प्रकरण निर्णयार्थ बंद करण्यात आले .

जळगाव जिल्ह्यातील एकूण ८ ग्रामसेवक यात राहुल नारायण पाटील (चिंचखेडा सिम बोदवड जि.जळगाव) , सुभाष रामलाल कुंभरे ,ग्रामसेवक (धौडखेडा ता. बोदवड जि . जळगाव) , सुरेश दत्तात्रय राजहंस ग्रामसेवक ग्रामपंचायत (वरखेड ता. बोदवड जि . जळगाव) , गणेश रामसिंग चव्हाण ग्रामसेवक ग्रामपंचायत (जुनोने दिगर ता. बोदवड जि . जळगाव ), राहुल नारायण पाटील, ग्रामसेवक (ग्रामपंचायत आमदगाव , ता. बोदवड जि . जळगाव) , नंदलाल किसन येशीराया ग्रामसेवक ग्रामपंचायत (लोंजे ता. चाळीसगाव जि . जळगाव) आदी तत्कालीन ग्रामसेवकांवर शासकीय दफ्तार बेकायदा ताब्यात ठेवणे प्रकरणी कारवाई करण्यात येऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने यावेळी जिल्हापेठ पोलीस निरीक्षक विलास शेंडे व पीएसआय प्रदीप चांदेलकर ,पो.काँ. योगेश ठाकुर,नरेंद्र दिवेकर, होमगार्ड मधुकर मोरे,स्वप्निल सपके,प्रशांत शिंपी, महिला होमगार्ड सुजाता ठाकुर यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. जिल्हाधिकारी डॉ. अभिजित राऊत यांच्या या धडक कारवाईमुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे .८ ग्रामसेवकांवर कारवाई झाल्याचा महाराष्ट्रातील पहिलाच खटला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. व आठ पैकी कर्तव्यावर गैरहजर असलेले विनायक चुडामण पाटील, ग्रामसेवक ग्रामपंचायत (झुरखेडा ता. धरणगाव जि. जळगाव ), अनिल कचरू जावळे ग्रामसेवक ग्रामपंचायत (डोणगाव ता. धरणगाव जि . जळगाव ) हे दिसून आले आहे. त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार आहे .
याबाबत विधी अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव अँड. हरुल देवरे यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की. संबंधित ग्रामसेवकांनकडे सन २०१५ पासून ते सन २०२० पावेतोचे शासकीय दफतर बेकायदा ताब्यात ठेवलेले आहे. वेळोवेळी संधी देऊन, मागणी करून तसेच खटल्याचे कामकाज सुरु असतानाही संधी देऊन देखील शासकीय दफ्तर जमा केले नाही . त्यामुळे सदरचे शासकीय दफतर संबंधितांना अटक करून दफतर जमा करण्याशिवाय पर्याय राहिला नाही अशी जिल्हाधिकारी यांची खात्री झाली. त्यामुळे, महा. ग्रा. पं. अधिनियम १९५८ चे कलम १७९ (२) नुसार दफ्तार देईपर्यंत किंवा ३० दिवसांपर्यंत कारावासाची शिक्षा सुनावली आहे .







