जळगाव प्रतिनिधी ;- जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या अहवालात आज जिल्ह्यातून १३ रूग्ण बाधित आढळून आले आहे. तर ३४ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आज पहिल्यांदा ११ तालुके निंरक असल्याचे दिसून आले आहे.
जळगाव शहर-३, जळगाव ग्रामीण-०, भुसावळ-०, अमळनेर-०, चोपडा-२, पाचोरा-२, भडगाव-०, धरणगाव-०, यावल-०, एरंडोल-०, जामनेर-०, रावेर-०, पारोळा-२, चाळीसगाव-०, मुक्ताईनगर आणि बोदवड निरंक असे एकुण १३ बाधित रूग्ण आढळले आहे.

आजच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात आजपर्यंत एकुण ५६ हजार ५५१ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी ५४ हजार ७२० रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आणि ४९० बाधित रूग्ण विविध ठिकाणी उपचार घेत आहे. आज दोन बाधित रूग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा कोवीड रूग्णालयाच्या वतीने कळविण्यात आले आहे.







