जळगाव;- शहरातील दादावाड़ी परिसरात भरणाऱ्या आठवडे बाजारातून एका व्यक्तीचा १० हजार रुपये किमतीचा मोबाईल लंपास केल्याची घटना बुधवारी घडली असून याप्रकरणी पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सूत्रांची दिलेली माहिती अशी कि बांभोरी ता.धरणगाव येथील रहिवासी राजेंद्र शंकर कोळी (वय-३२) हे हॉटेल चालक असून ते दादावाडी येथे ६ जानेवारी रोजी बुधवार असल्याने ते सायंकाळी ५.४५ वाजेच्या सुमारास बांभोरीहून दादावाडी येथील आठवडे बाजारात आले. दादावाडी जैन मंदीरासमोर असलेल्या गौतमा गॅस एजन्सीच्या बाजूला भाजीपाला खरेदी करत असतांना गर्दीचा फायदा घेवून अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या खिश्यातील मोबाईल लांबविला. सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास मोबाईल चोरी गेल्याचा प्रकार लक्षात आला. राजेंद्र कोळी यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक विश्वनाथ गायकवाड करीत आहे.







