प्रा. हितेश पाटील यांनी अभियंत्यांच्या समोर सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाणांशी साधला संपर्क …

जळगाव (प्रतिनिधी) – राज्य मार्ग २७० वरील नशिराबाद ते घाणखेड या रसत्याची अवस्था बिकट झाली आहे. त्यामूळे गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. नागरिकांकडून वारंवार मागणी होऊनही सार्वजनिक बांधकाम बोदवड ऊपविभागाकडून दुर्लक्ष होत आहे. मलकापूर चौफूली ते पाटील पेट्रोल पंपापर्यंतच्या रसत्यावरील खड्डे मातीमिश्रीत मुरुमाने बुजविले गेले असून सा.बां. ऊपविभागाचे त्यावर दुर्लक्ष झाले असून त्यापूढे घाणखेड पर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने शासनाच्या लाखो रुपयांचा चुराडा होत आहे. या सर्व प्रकारावर युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. हितेश पाटील यांनी अधिक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांची भेट घेत निवेदन दिले. यादरम्यान राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला. रसत्यावरील कामे ऊत्कृष्ठ दर्जाचे व्हावेत अन्यथा याला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्याबाबतच्या सुचना सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी अधिक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांना दिल्या.
सदरील रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी शासनाकडून करोडो रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.परंतू निकृष्ट दर्जाचे काम झाल्यामूळे कामाची गुणवत्ता ढासळल्याने शासनाच्या निधीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ठेकेदाराने नोंदणीच्या नियमांचे , निविदा करारातील तसेच निविदा सूचनेतील अटी व शर्तीचे पालन न केल्यामुळे तसेच कामांचा दर्जा न राखल्याने कामात गैरप्रकार केला असल्याने संबंधित ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई करुन त्यांना काळ्या यादीच टाकण्याची मागणी यावेळेस युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. हितेश पाटिल यांनी निवेदनातून केली आहे. सदरील निवेदनावर येत्या ७ दिवसांत कारवाई न झाल्यास अधिक्षक अभियंत्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करणार असल्याचे युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. हितेश पाटील यांनी सांगितले.
यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. हितेश पाटिल , जिल्हा ऊपाध्यक्ष अंबादास गोसावी, किरण पाटिल, पराग घोरपडे, ईमरान खान ईद्रीस खान, दिग्विजय पाटिल, शिवाजी पवार, अमोल व्यवहारे यांच्यासमवेत आदि जण ऊपस्थित होते.







