जिल्ह्यातील सात तालुके निरंक

जळगाव (प्रतिनिधी) – गेल्या दोन दिवसांपासून कोरोनाच्या अहवालात आता रूग्ण संख्येत वाढ होतांना दिसून येत आहे. आज जिल्ह्यातून ६० रूग्ण आढळून आले आहेत तर ५२ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे.
आजच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील एकुण आकडा ५३ हजार ९५१ वर पोहचली आहे, यापैकी ५२ जार २९० रूग्ण बरे होवून घरी परतले आहे तर ३७७ रूग्णा उपचार घेत आहे. सुदैवाने एकाही रूग्णाचा मृत्यू झाला नाही. अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे.
जळगाव शहर १६, जळगाव ग्रामीण ३, भुसावळ ११, अमळनेर ११, चोपडा ५, पाचोरा १, यावल ७, रावेर ३, मुक्ताईनगर १, इतर जिल्हा २ तर भडगाव, धरणगाव, एरंडोल, जामनेर, पारोळा, चाळीसगाव आणि बोदवड तालुक्यात रूग्ण संख्या निरंक आढळून आली आहे.







