दुर्गंधी सुटल्याने जळगाव तुकारामवाडीतील घटना उघडकीस
जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील तुकारामवाडी परिसरातील ६१ वर्षीय वृध्दाने घरात कोणीही नसतांना गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना रविवारी 25 रोजी सकाळी उघडकीस असली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
हातमजुरी करून उदरनिर्वाह करणारे ज्ञानेश्वर जगन्नाथ महाजन (वय-६१, रा. तुकारामवाडी) हे एकटेच वास्तव्यास होते. पत्नी व दोन मुले हे रामेश्वर कॉलनी परीसरात वेगळे राहतात. तुकारामवाडी परिसरात ज्ञानेश्वर महाजन यांच्या शेजारी राहत असलेल्या त्यांच्या नातेवाईकांना विचित्र दुर्गंधी सुटल्याचे जाणवले. दोन दिवसांपासून ज्ञानेश्वर महाजन यांचा दरवाजा बंद होता. शंका आल्याने नागरिकांनी पाहणी केली असता ज्ञानेश्वर महाजन हे गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसुन आले. तसेच याचमुळे दुर्गंधी सुटल्याचेही निष्पन्न झाले. याबाबत परिसरातील नागरिकांना एमआयडीसी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सपोनि अमोल मोरे , पोहेकॉ रतीलाल पवार, पो. कॉ. साईनाथ मुंडे यांनी घटनास्थळ गाठले. दोन दिवस उलटल्याने मृतदेह पुर्णपणे कुजलेला होता. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून नागरिकांच्या मदतीने मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात हलविला. याप्रकरणी जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ प्रवीण पाटील यांच्या खबरीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.







