जळगाव ( प्रतिनिधी ) – भक्ती, आनंद आणि पालकांच्या उत्स्फूर्त सहभागाने अनुभूती बाल निकेतन व अनुभूती विद्या निकेतनमध्ये ४ सप्टेंबर रोजी जन्माष्टमी उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने शाळेचा परिसर जणू गोकुळ-वृंदावनातच रूपांतरित झाला होता.



उत्सवाचे विशेष आकर्षण ठरले ते मातांचा उत्स्फूर्त सहभाग घेतला. मातांनी नृत्य, नाटिका, भजन आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत वातावरण कृष्णमय केले. त्यांच्या सादरीकरणातून श्रीकृष्णावरील भक्ती, वात्सल्य आणि मुलांप्रती असलेले प्रेम व्यक्त झाले. मातांचा सहभाग पाहून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरही आनंद फुलला.
शाळेच्या वतीने पालकांना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासातील महत्त्वाचे भागीदार मानले जाते. घर आणि शाळा यांच्यातील सुदृढ नाते मुलांच्या भावनिक, सामाजिक, बौद्धिक आणि सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचे असल्याचा चेअरमन संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
या प्रसंगी अनुभूती स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका निशा जैन व अंबिका जैन यांनी पालक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा देत त्यांच्या सहभागाचे कौतुक केले. प्राचार्य मनोज परमार यांनी सर्व माता, पालक, शिक्षक व कर्मचाऱ्यांचे आभार मानले. पालक-शाळा नात्यातील प्रेम, विश्वास आणि सहभाग अधोरेखित करणारा हा जन्माष्टमी उत्सव विद्यार्थ्यांसाठी आनंददायी आणि संस्मरणीय ठरला.









