जि. प. सेस २०२५-२६ अंतर्गत तरतूद
जळगाव (प्रतिनिधी): –जिल्हा परिषद जळगावच्या दिव्यांग कल्याण विभागामार्फत जि. प. सेस २०२५-२६ अंतर्गत एक महत्त्वपूर्ण आणि लोकाभिमुख उपक्रम यशस्वीरित्या राबविण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील नोंदणीकृत व मान्यताप्राप्त कर्णबधीर विद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या एकूण ३४६ विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे ६९२ कर्णयंत्रांचे वितरण करण्यात आले आहे.


जिल्हा दिव्यांग समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी तथा समिती अध्यक्ष रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. बैठकीत दिव्यांग कल्याणाशी संबंधित विविध योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. स्वप्निल सांगोळे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण योगेश पाटील, नगरपालिका सह आयुक्त जनार्दन पवार, दिव्यागं सक्षमीकरण अधिकारी पद्मनाभ म्हस्के तसेच संबधीत विविध दिव्यांग संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
या योजनेसाठी सुमारे ₹53.00 लक्ष इतका निधी जिल्हा परिषदेच्या स्व उत्पन्नातून खर्च करण्यात आला असून, दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व वैयक्तिक विकासासाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
या उपक्रमाचा प्रातिनिधिक वितरण सोहळा या बैठकीत पार पडला.यावेळी जिल्हाधिकारी श्री. रोहन घुगे तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. मिनल करनवाल यांच्या शुभहस्ते कर्णबधीर विद्यार्थ्यांना कर्णयंत्रांचे वाटप करण्यात आले.
कर्णयंत्रांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या श्रवण क्षमतेत लक्षणीय वाढ होऊन त्यांच्या शिक्षणात अधिक सुलभता येणार असून, दैनंदिन जीवनातील संवाद क्षमता सुधारण्यासही मोठी मदत होणार आहे. या उपक्रमामुळे दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार असून, त्यांच्या मुख्य प्रवाहात समावेशनास बळकटी मिळेल. जिल्हा दिव्यांग समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी तथा समिती अध्यक्ष रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. बैठकीत दिव्यांग कल्याणाशी संबंधित विविध योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. स्वप्निल सांगोळे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण योगेश पाटील, नगरपालिका सह आयुक्त जनार्दन पवार, दिव्यागं सक्षमीकरण अधिकारी पद्मनाभ म्हस्के तसेच संबधीत विविध दिव्यांग संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हा परिषद जळगावच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या अशा उपक्रमांमुळे दिव्यांग बांधवांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू आहे.









