नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – देशात कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या 3 लाख 20 हजारांवर गेली आहे. मागील 24 तासांमध्ये सर्वाधिक 11 हजार 929 कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. सलग दुसऱ्या दिवशी एवढे रुग्ण आढळून आले आहेत. 24 तासात सर्वाधिक 311 बळी गेले तर कोरोनाबाधितांच्या संख्येत 24 तासात आतापर्यंतची सर्वाधिक 11 हजार 929 ने वाढ झाली आहे.
सलग चौथ्या दिवशी 300 पेक्षा जास्त बळी गेले आहेत. तर दिवसभरात 8 हजार 50 रुग्ण बरे झाले आहेत. देशात 1 लाख 62 हजार 379 रुग्ण बरे झाले आहेत. म्हणजे देशाचा रिकव्हरी रेट 50.59 टक्के आहे. सध्या कोरोनाची लागण असलेले 1 लाख 49 हजार 348 रुग्ण आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 9 हजार 195 जणांचा मृत्यू झाला आहे.
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढताना दिसत आहे. कोरोना बाधितांच्या संख्येत भारताने शुक्रवारी भारताने ब्रिटनला मागे सोडले. त्यामुळे भारत जगभरातील कोरोना बाधित देशांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे.
अमेरिका, ब्राझील, रूसनंतर कोरोना महामारीमुळे सर्वाधिक प्रभावित देशांमध्ये भारत चौथ्या क्रमांकावर आहे. भारतापेक्षा अधिक रुग्ण अमेरिका अमेरिका (21,42,672), ब्राजील (8,50,796), रूस (5,20,129)मध्ये आहेत. तर भारत रुग्ण वाढीचा वेगात जगभरात तिसऱ्या क्रमांकावर आहे. अमेरिका आणि ब्राझीलनंतर एक दिवसात सर्वाधिक रुग्ण भारतात आहेत.