धरणगाव तालुक्यात चावलखेडा येथील घटना
धरणगाव ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील चावलखेडे येथील महिला शोभाबाई दिलीप अहिरे यांच्या बेघर वस्तीतील झोपडीला अचानक आग लागल्याने त्यांचा संपूर्ण संसार उघड्यावर आला आहे. दोन दिवसांपूर्वी दुपारी ही घटना घडली.

गेल्या ३० ते ४० वर्षांपासून पार्टिशनच्या कच्च्या झोपडीत राहणाऱ्या शोभाबाई अहिरे यांच्या घरातील संसारोपयोगी साहित्य आणि कष्टाने जमवलेले रोख ५० हजार रुपये या आगीत जळून खाक झाले आहेत. त्यांना बचत गटातून ७० हजार रुपयांचे कर्ज मिळाले होते, त्यातील २० हजार रुपये खर्च झाले होते आणि उर्वरित ५० हजार रुपये घरात ठेवलेले होते, जे जळून गेले. शोभाबाई या मोलमजुरी करून आपली गुजराण करतात. त्यांची परिस्थिती अत्यंत बिकट आहे.









